शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मॅटने दिला ‘त्या’ कर्मचाऱ्यांना न्याय

By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST

परभणी: शासकीय अध्यादेशाचा वेगळा अर्थ लावून महसूल विभागातील १८ कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित ठेवले होते.

परभणी: शासकीय अध्यादेशाचा वेगळा अर्थ लावून महसूल विभागातील १८ कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित ठेवले होते. ही कालबद्ध पदोन्नती कर्मचाऱ्यांना लागू करावी, असा आदेश महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण मंडळाने (मॅट) दिला आहे.
शासन सेवेत असताना वर्ग ३ आणि ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ पदोन्नतीची संधी निर्माण होत नसल्याने कर्मचाऱ्यांची कुंठीतता घालविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी १२ वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नती देण्याचे शासनादेश आहेत. त्यानुसार लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पहिला लाभ अव्वल कारकूनपदाची वेतनश्रेणी तर दुसरा लाभ नायब तहसीलदाराची वेतनश्रेणी बहाल केली जाते.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पात्र कर्मचाऱ्यांचे आदेश काढण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र असे आदेश काढताना १८ कर्मचाऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले. १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या काळात सेवानिवृत्त झालेल्या या १८ कर्मचाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण मंडळाकडे धाव घेतली. सेवेत कार्यरत असताना पदोन्नती न मिळाल्यामुळे निर्माण झालेली कुंठीतता घालविण्यासाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना २००६ लागू केली आहे. या योजनेत १ एप्रिल २०१० रोजी जे सेवेत कार्यरत आहेत त्यांनाच या सेवेचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या काळात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दुसरा लाभ अनुज्ञेय नाही, असे कारण दाखविले. हा निर्णय अन्यायकारण असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१० मध्ये योजनेची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २००६ पासून नमूद केली आहे. त्यामुळे आम्ही १ आॅक्टोबर २००६ रोजी सेवेत होतो आणि ३१ मार्च २०१० पर्यंत सेवानिवृत्त झालो. त्यामुळे १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० पर्यंत सेवेत असलेल्या कालावधीचा विचार करता दुसऱ्या लाभाचे फायदे मिळणे न्यायसंगत आहे.
परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचे कोणतेही निर्देश प्राप्त होण्यापूर्वीच ६ एप्रिल २०११ ला पदोन्नती आदेश काढले आहेत. त्यामुळे अस्थापनेतील १८ कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. हे प्रकरण महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण मंडळात दाखल झाल्यानंतर मंडळाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.(प्रतिनिधी)