शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बाजार समित्यांचा ‘जीव’ गुदमरतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 7:28 PM

आर्थिक उत्पन्नासाठी नव्या मार्गांचा शोध

- रऊफ शेख । 

फुलंब्री (औरंगाबाद ) : राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशामुळे व्यापाऱ्यांवरील नियंत्रण कमी झाले, शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने मिळणारे आर्थिक उत्पन्नही आता बंद झाल्याने आता अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बाजार समित्यांना नवीन उत्पन्नांचे मार्ग शोधावे लागत आहेत. यासंदर्भात फुलंब्री बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांच्याशी साधलेला संवाद. 

शासनाने बाजार समित्यांसंदर्भात कोणते नवीन आदेश काढले व त्या आदेशानुसार होणारे नुकसान काय?शासनाने काढलेल्या नवीन आदेशात बाजार समिती आवारात व्यापारी धोरण खुले केले. यात शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीचे नियंत्रण राहिलेले नाही, तसेच त्यांच्याकडून बाजार समिती फी आता वसूल करणे बंद करण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका बाजार समितीला बसला आहे. 

बाजार समिती कुणाकडून फी वसूल करीत होती?बाजार समिती केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. फी केवळ व्यापाऱ्यांकडून वसूल केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाप्रकारे फायदाच होत होता. आता उलट व्यापारी आपली मनमानी करीत असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही. त्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे. यावर बाजार समितीचा दबाव नाही.   

बाजार समिती वसूल केलेल्या फीमधून कोणती कामे करीत होती? शेतकऱ्यांसाठी बाजार समिती यार्डात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात कमी दरात वजन काटा लावला. शेतकऱ्यांसाठी नाला बंडिंग तयार केल्या. रासायनिक खते बांधापर्यंत पोहोच केली. व्यापारी गाळे उभारले. 

बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणार? नियमित मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे बाजार समिती नवीन उत्पन्नांचे साधन तयार करीत आहे. बाजार समिती आवारात व वडोदबाजारमध्ये गाळे निर्माण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मंगल कार्यालय उभारले असून, वजन काटा सुरू केला. यापासून नवीन उत्पन्नांचे साधन निर्माण केलेच, शिवाय येणाऱ्या काळात फळे, भाजीपाला खरेदी केंद्र सुरू करणे, कर्ज तारण योजना राबविणे, पेट्रोलपंप सुरू करणार, मुरघास प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. यातून आर्थिक उत्पन्नाचे मार्ग निर्माण होतील.

शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा का?  होय, शासनाने बाजार समितीबाबत जो निर्णय घेतला त्यात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान आहे. कारण बाजार समिती शेतकऱ्यांकडून फी वसूल करीत नाही. फी केवळ व्यापाऱ्यांकडून घेते, तसेच व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जात होते ते नियंत्रणात आता राहिलेले नाही. परिणामी, व्यापारी मनमानी पद्धतीने शेतमाल विकत घेत आहेत. 

शासनाच्या नवीन धोरणामुळे किती आर्थिक नुकसान झाले?बाजार समितीला मिळणारे पारंपरिक उत्पन्न बंद झाले. व्यापारी व जीनिंग यांच्याकडून बाजार समिती फी वसूल करीत होती. शासनाने काढलेल्या नवीन आदेशामुळे वर्षभरात ४० लाखांचे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना ब्रेक लागणार आहे. 

शासनाने घेतलेला निर्णय हा सहकार क्षेत्र मोडीत काढण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे व हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक आहे. यासाठी शासनाने नक्कीच फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहेच.शासनाच्या नवीन आदेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितावर टाच आली आहे. - संदीप बोरसे

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी