शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ७५ लाख एकरवरील पिकांचा झाला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:03 IST

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; मदत कधी मिळणार ?

ठळक मुद्देअंदाजे २० हजार कोटी पाण्यातकोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ७५ लाख एकर जमिनीवरील खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली असून, सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची रबी हंगामाची मदार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, सरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी,अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी एकरी २० हजारांपेक्षा अधिकचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. 

सर्व राजकीय पक्षांमध्ये ओला दुष्काळ पाहण्याची चढाओढ लागली आहे. राज्यात सरकार स्थापनेबाबत अजून अनिश्चितता आहे. केंद्र शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. हताश आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र सध्या काहीही उरलेले नाही. कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला आहे. १ ते ३१ आॅक्टोबर या महिनाभरात ४२१ पैकी १४१ मंडळांत अतिवृष्टी झाली. ८ हजार ४५० गावांतील ३२ लाख ३१ हजार ४९६ शेतकऱ्यांचे नुकसान परतीच्या आणि आजच्या स्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झाले आहे. ४८ लाख ७० हजार १९७ पैकी ३० लाख ३९ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र ओल्या दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये ११ लाख ४२ हजार २९५ हेक्टर कापूस, २ लाख ३२ हजार ३८ हेक्टर मका, ९५ हजार ५२३ हेक्टरवरील बाजरी, ६० हजार ९०७ हेक्टरवरील ज्वारी, १४ लाख २९ हजार ४१ हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकाचा पूर्णत: चिखल झाला आहे. ९० टक्के कापसाची बोंडे फुटली आहेत, मका ९५ टक्के, तर ज्वारी, सोयाबीन, कडधान्यांची पिके नष्ट झाल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला आहे. 

पीकविम्याची स्थिती अशी३३८ कोटी रुपयांची रक्कम मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भरली आहे. त्यातून १४ हजार ४७७ कोटी रुपये ही रक्कम विमा संरक्षणाची आहे. अंदाजे ३९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. २ लाख ९३ हजार ९७२ निवेदने पीकविम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी केली होती. 

शिवसेनेचे मत असेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमतने याप्रकरणी प्रश्न केला की, विभागातील २० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली आहे. अंदाजे ७५ लाख एकर जमिनीवरील पिकांचा चिखल झाला आहे, दुष्काळ पाहणीतून काय हाती लागणार आहे, यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्र शासनाने तातडीने साडेसात हजार कोटी रुपयांची मदत कोणत्याही निकषांचा विचार न करता तातडीने द्यावी. २५ हजार रुपये हेक्टरी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हाती द्यावेत. ही रक्कम कोणत्याही बाकीतून वळती करून घेऊ नये. थेट रक्कम दिली तर शेतकऱ्यांना रबी हंगामाला आधार होईल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती