शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

मराठवाड्यात ७५ लाख एकरवरील पिकांचा झाला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:03 IST

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; मदत कधी मिळणार ?

ठळक मुद्देअंदाजे २० हजार कोटी पाण्यातकोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ७५ लाख एकर जमिनीवरील खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली असून, सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची रबी हंगामाची मदार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, सरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी,अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी एकरी २० हजारांपेक्षा अधिकचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. 

सर्व राजकीय पक्षांमध्ये ओला दुष्काळ पाहण्याची चढाओढ लागली आहे. राज्यात सरकार स्थापनेबाबत अजून अनिश्चितता आहे. केंद्र शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. हताश आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र सध्या काहीही उरलेले नाही. कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला आहे. १ ते ३१ आॅक्टोबर या महिनाभरात ४२१ पैकी १४१ मंडळांत अतिवृष्टी झाली. ८ हजार ४५० गावांतील ३२ लाख ३१ हजार ४९६ शेतकऱ्यांचे नुकसान परतीच्या आणि आजच्या स्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झाले आहे. ४८ लाख ७० हजार १९७ पैकी ३० लाख ३९ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र ओल्या दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये ११ लाख ४२ हजार २९५ हेक्टर कापूस, २ लाख ३२ हजार ३८ हेक्टर मका, ९५ हजार ५२३ हेक्टरवरील बाजरी, ६० हजार ९०७ हेक्टरवरील ज्वारी, १४ लाख २९ हजार ४१ हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकाचा पूर्णत: चिखल झाला आहे. ९० टक्के कापसाची बोंडे फुटली आहेत, मका ९५ टक्के, तर ज्वारी, सोयाबीन, कडधान्यांची पिके नष्ट झाल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला आहे. 

पीकविम्याची स्थिती अशी३३८ कोटी रुपयांची रक्कम मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भरली आहे. त्यातून १४ हजार ४७७ कोटी रुपये ही रक्कम विमा संरक्षणाची आहे. अंदाजे ३९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. २ लाख ९३ हजार ९७२ निवेदने पीकविम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी केली होती. 

शिवसेनेचे मत असेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमतने याप्रकरणी प्रश्न केला की, विभागातील २० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली आहे. अंदाजे ७५ लाख एकर जमिनीवरील पिकांचा चिखल झाला आहे, दुष्काळ पाहणीतून काय हाती लागणार आहे, यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्र शासनाने तातडीने साडेसात हजार कोटी रुपयांची मदत कोणत्याही निकषांचा विचार न करता तातडीने द्यावी. २५ हजार रुपये हेक्टरी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हाती द्यावेत. ही रक्कम कोणत्याही बाकीतून वळती करून घेऊ नये. थेट रक्कम दिली तर शेतकऱ्यांना रबी हंगामाला आधार होईल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती