शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

मराठवाड्यात ७५ लाख एकरवरील पिकांचा झाला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:03 IST

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; मदत कधी मिळणार ?

ठळक मुद्देअंदाजे २० हजार कोटी पाण्यातकोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ७५ लाख एकर जमिनीवरील खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली असून, सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची रबी हंगामाची मदार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, सरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी,अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी एकरी २० हजारांपेक्षा अधिकचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. 

सर्व राजकीय पक्षांमध्ये ओला दुष्काळ पाहण्याची चढाओढ लागली आहे. राज्यात सरकार स्थापनेबाबत अजून अनिश्चितता आहे. केंद्र शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. हताश आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र सध्या काहीही उरलेले नाही. कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात यंदा शेतकरी अडकला आहे. १ ते ३१ आॅक्टोबर या महिनाभरात ४२१ पैकी १४१ मंडळांत अतिवृष्टी झाली. ८ हजार ४५० गावांतील ३२ लाख ३१ हजार ४९६ शेतकऱ्यांचे नुकसान परतीच्या आणि आजच्या स्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झाले आहे. ४८ लाख ७० हजार १९७ पैकी ३० लाख ३९ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र ओल्या दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये ११ लाख ४२ हजार २९५ हेक्टर कापूस, २ लाख ३२ हजार ३८ हेक्टर मका, ९५ हजार ५२३ हेक्टरवरील बाजरी, ६० हजार ९०७ हेक्टरवरील ज्वारी, १४ लाख २९ हजार ४१ हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकाचा पूर्णत: चिखल झाला आहे. ९० टक्के कापसाची बोंडे फुटली आहेत, मका ९५ टक्के, तर ज्वारी, सोयाबीन, कडधान्यांची पिके नष्ट झाल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला आहे. 

पीकविम्याची स्थिती अशी३३८ कोटी रुपयांची रक्कम मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भरली आहे. त्यातून १४ हजार ४७७ कोटी रुपये ही रक्कम विमा संरक्षणाची आहे. अंदाजे ३९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. २ लाख ९३ हजार ९७२ निवेदने पीकविम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी केली होती. 

शिवसेनेचे मत असेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमतने याप्रकरणी प्रश्न केला की, विभागातील २० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली आहे. अंदाजे ७५ लाख एकर जमिनीवरील पिकांचा चिखल झाला आहे, दुष्काळ पाहणीतून काय हाती लागणार आहे, यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्र शासनाने तातडीने साडेसात हजार कोटी रुपयांची मदत कोणत्याही निकषांचा विचार न करता तातडीने द्यावी. २५ हजार रुपये हेक्टरी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हाती द्यावेत. ही रक्कम कोणत्याही बाकीतून वळती करून घेऊ नये. थेट रक्कम दिली तर शेतकऱ्यांना रबी हंगामाला आधार होईल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती