शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:24 IST

Marathwada hits by Return rains नद्या, नाल्यांना पूर, पिकांचे अतोनात नुकसान

ठळक मुद्देमराठवाड्यात अनेक धरणांतून विसर्ग वीज पडून ३ ठार,तर दोन जण जखमी झाले आहेत. 

औरंगाबाद : यावर्षी अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे. परतीच्या जोरदार पावसाने रविवारी मराठवाड्यात  तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. 

बीड जिल्ह्यातील सर्वच भागांत रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आले. त्यामुळे विविध ठिकाणी काही गावांचा संपर्क पूर ओसरेपर्यंत तुटला होता. केज तालुक्यात वीज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाला. बीड शहर, गेवराई, धारूर, वडवणी, शिरूर कासार, आष्टी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. माजलगाव धरणाचे तीन  दरवाजे रविवारी पहाटे उघडण्यात आले.जालना शहर व परिसरात रविवारी चार वाजेनंतर धुवाधार पाऊस झाला. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. नांदेड शहरासह कंधार, लोहा, नायगाव, मुदखेड, अर्धापूर या भागात रविवारी दुपारी पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पिकाला पावसाचा अधिक फटका बसला आहे. तसेच हजारो हेक्टर क्षेत्रावरील उसाचे पीकही आडवे झाले. लातूर शहरासह जिल्ह्यात औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे.      

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी रात्रभर पाऊस सुरू होता. रविवारीही दिवसभर पावसाने हजेरी लावली. हिंगोली व सेनगाव तालुक्यांतील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. औंढा, वसमत, कळमनुरी तालुक्यांतही रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जमिनी जलमय झाल्या होत्या. सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात व शहरात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.

वीज पडून तिघांचा मृत्यूमराठवाड्यात रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी अंतर्गत येणाऱ्या आनंदगाव येथे सायंकाळी ५.३० वा. वीज पडून सूर्यकांता गोरख गायके, मथुरा गणेश काळे जखमी झाल्या. जालना येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडच्या केज तालुक्यातील हादगाव येथील झुंबरलाल शिवाजी केशव भांगे  यांच्यावर शेतातून घरी परतत असताना वीज पडली, त्यात ते दगावले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील औराळ येथील बालाजी दशरथ गवाले हे शेतात काम करीत असताना त्यांच्यावर वीज पडून ते दगावले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आलियाबादवाडी येथील सुशील बबन गायकवाड या वीज पडून मृत पावल्या.

पाणीच पाणी चोहीकडेपरभणी जिल्ह्यात शेतजमिनीत पाणी साचून कापणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्याचप्रमाणे येलदरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून  ४ हजार २१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. इकडे माजलगाव प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि होणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊस