शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:24 IST

Marathwada hits by Return rains नद्या, नाल्यांना पूर, पिकांचे अतोनात नुकसान

ठळक मुद्देमराठवाड्यात अनेक धरणांतून विसर्ग वीज पडून ३ ठार,तर दोन जण जखमी झाले आहेत. 

औरंगाबाद : यावर्षी अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे. परतीच्या जोरदार पावसाने रविवारी मराठवाड्यात  तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. 

बीड जिल्ह्यातील सर्वच भागांत रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आले. त्यामुळे विविध ठिकाणी काही गावांचा संपर्क पूर ओसरेपर्यंत तुटला होता. केज तालुक्यात वीज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाला. बीड शहर, गेवराई, धारूर, वडवणी, शिरूर कासार, आष्टी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. माजलगाव धरणाचे तीन  दरवाजे रविवारी पहाटे उघडण्यात आले.जालना शहर व परिसरात रविवारी चार वाजेनंतर धुवाधार पाऊस झाला. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. नांदेड शहरासह कंधार, लोहा, नायगाव, मुदखेड, अर्धापूर या भागात रविवारी दुपारी पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पिकाला पावसाचा अधिक फटका बसला आहे. तसेच हजारो हेक्टर क्षेत्रावरील उसाचे पीकही आडवे झाले. लातूर शहरासह जिल्ह्यात औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे.      

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी रात्रभर पाऊस सुरू होता. रविवारीही दिवसभर पावसाने हजेरी लावली. हिंगोली व सेनगाव तालुक्यांतील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. औंढा, वसमत, कळमनुरी तालुक्यांतही रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जमिनी जलमय झाल्या होत्या. सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात व शहरात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.

वीज पडून तिघांचा मृत्यूमराठवाड्यात रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी अंतर्गत येणाऱ्या आनंदगाव येथे सायंकाळी ५.३० वा. वीज पडून सूर्यकांता गोरख गायके, मथुरा गणेश काळे जखमी झाल्या. जालना येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडच्या केज तालुक्यातील हादगाव येथील झुंबरलाल शिवाजी केशव भांगे  यांच्यावर शेतातून घरी परतत असताना वीज पडली, त्यात ते दगावले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील औराळ येथील बालाजी दशरथ गवाले हे शेतात काम करीत असताना त्यांच्यावर वीज पडून ते दगावले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आलियाबादवाडी येथील सुशील बबन गायकवाड या वीज पडून मृत पावल्या.

पाणीच पाणी चोहीकडेपरभणी जिल्ह्यात शेतजमिनीत पाणी साचून कापणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्याचप्रमाणे येलदरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून  ४ हजार २१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. इकडे माजलगाव प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि होणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊस