शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील ३० हजार लोकांच्या रोजगारावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:33 IST

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सुमारे ३० हजार लोकांच्या रोजगारावरही संकट आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावरून रोजगार हिरावण्याची भीती असल्याने कामगार, कर्मचारी तसेच उद्योजकही चिंताग्रस्त झाले आहेत. 

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या प्लास्टिक उद्योगाला फटका बसणार आहे

औरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या प्लास्टिक उद्योगाला फटका बसणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सुमारे ३० हजार लोकांच्या रोजगारावरही संकट आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावरून रोजगार हिरावण्याची भीती असल्याने कामगार, कर्मचारी तसेच उद्योजकही चिंताग्रस्त झाले आहेत. 

प्लास्टिक बंदीमुळे मराठवाड्यात ३५० पेक्षा अधिक लहान-मोठे उद्योग कचाट्यात सापडले आहेत. प्लास्टिक उद्योगांतून मराठवाड्यातील ३५० उद्योगांतून वर्षाकाठी सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होते, तर सुमारे तीस हजार जणांचा रोजगार त्यावर अवलंबून असल्याची माहिती मराठवाडा प्लास्टिक असोसिएशनकडून मिळाली. 

औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत १७५ उद्योग आहेत. जालना येथे ५० तर उर्वरित मराठवाड्यात १२५ लहान-मोठे उद्योग आहेत. यामध्ये प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, स्ट्रॉ, कॅरिबॅग, पॅकेजिंग बॅग, थर्माकोलचे साहित्य, मेडिकल, आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील उत्पादनांसाठी लागणारे प्लास्टिक आदींचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंच्या उत्पादन व विक्रीवरही बंदी आणण्यात आली.

बंदी असलेली आणि बंदी नसलेली ठराविक उत्पादनांचीच नावे आतापर्यंत समोर येत आहेत; परंतु इतर अनेक प्लास्टिक उत्पादनांसंदर्भात स्पष्टता झाली नसल्याने उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खाद्यपदार्थांना लागणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादनही औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत होते. त्यावर बंदी नसल्याचे सांगण्यात येते, तर दुसरीकडे बाजारात हेच खाद्यपदार्थ किरकोळ स्वरूपात विकताना पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर (हॅण्डल नसलेली) बंदी घातली जात आहे. त्यामुळे या पिशव्यांचे उत्पादन घेणाऱ्या उद्योजकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

उत्पादन थांबविलेप्लास्टिकच्या कॅरिबॅग १०० टक्के बंद झाल्या पाहिजेत. त्यास आमचा पाठिंबा आहे; परंतु दैनंदिन जीवनात किरकोळ वस्तू पॅक करून देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंग बॅगवर बंदी टाकण्यात आली. खाद्यपदार्थांच्या मोठमोठ्या कंपन्याही उत्पादन प्लास्टिकमधून देतात. त्यांना मात्र वगळण्यात आले. कोणताही पर्याय न देता थेट बंदी लावण्यात आली. पॅकिंग बॅगचे उत्पादन घेणाऱ्यांनी सध्या उत्पादन थांबविले आहे. यामुळे केलेली गुंतवणूक, कामगाराच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. - बी. के. चौधरी, मराठवाडा प्लास्टिक असोसिएशन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाPlastic banप्लॅस्टिक बंदीEmployeeकर्मचारीbusinessव्यवसाय