शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील ३० हजार लोकांच्या रोजगारावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:33 IST

राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सुमारे ३० हजार लोकांच्या रोजगारावरही संकट आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावरून रोजगार हिरावण्याची भीती असल्याने कामगार, कर्मचारी तसेच उद्योजकही चिंताग्रस्त झाले आहेत. 

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या प्लास्टिक उद्योगाला फटका बसणार आहे

औरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने मराठवाड्यातील सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या प्लास्टिक उद्योगाला फटका बसणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सुमारे ३० हजार लोकांच्या रोजगारावरही संकट आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावरून रोजगार हिरावण्याची भीती असल्याने कामगार, कर्मचारी तसेच उद्योजकही चिंताग्रस्त झाले आहेत. 

प्लास्टिक बंदीमुळे मराठवाड्यात ३५० पेक्षा अधिक लहान-मोठे उद्योग कचाट्यात सापडले आहेत. प्लास्टिक उद्योगांतून मराठवाड्यातील ३५० उद्योगांतून वर्षाकाठी सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होते, तर सुमारे तीस हजार जणांचा रोजगार त्यावर अवलंबून असल्याची माहिती मराठवाडा प्लास्टिक असोसिएशनकडून मिळाली. 

औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत १७५ उद्योग आहेत. जालना येथे ५० तर उर्वरित मराठवाड्यात १२५ लहान-मोठे उद्योग आहेत. यामध्ये प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, स्ट्रॉ, कॅरिबॅग, पॅकेजिंग बॅग, थर्माकोलचे साहित्य, मेडिकल, आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील उत्पादनांसाठी लागणारे प्लास्टिक आदींचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंच्या उत्पादन व विक्रीवरही बंदी आणण्यात आली.

बंदी असलेली आणि बंदी नसलेली ठराविक उत्पादनांचीच नावे आतापर्यंत समोर येत आहेत; परंतु इतर अनेक प्लास्टिक उत्पादनांसंदर्भात स्पष्टता झाली नसल्याने उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खाद्यपदार्थांना लागणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादनही औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत होते. त्यावर बंदी नसल्याचे सांगण्यात येते, तर दुसरीकडे बाजारात हेच खाद्यपदार्थ किरकोळ स्वरूपात विकताना पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर (हॅण्डल नसलेली) बंदी घातली जात आहे. त्यामुळे या पिशव्यांचे उत्पादन घेणाऱ्या उद्योजकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

उत्पादन थांबविलेप्लास्टिकच्या कॅरिबॅग १०० टक्के बंद झाल्या पाहिजेत. त्यास आमचा पाठिंबा आहे; परंतु दैनंदिन जीवनात किरकोळ वस्तू पॅक करून देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंग बॅगवर बंदी टाकण्यात आली. खाद्यपदार्थांच्या मोठमोठ्या कंपन्याही उत्पादन प्लास्टिकमधून देतात. त्यांना मात्र वगळण्यात आले. कोणताही पर्याय न देता थेट बंदी लावण्यात आली. पॅकिंग बॅगचे उत्पादन घेणाऱ्यांनी सध्या उत्पादन थांबविले आहे. यामुळे केलेली गुंतवणूक, कामगाराच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. - बी. के. चौधरी, मराठवाडा प्लास्टिक असोसिएशन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाPlastic banप्लॅस्टिक बंदीEmployeeकर्मचारीbusinessव्यवसाय