शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

औरंगाबादेत कचरा, पाणी प्रश्नावर मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:54 IST

शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. शहरातील प्रत्येक वसाहतीला तीन दिवसाआड पाणी देण्यात येईल.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. शहरातील प्रत्येक वसाहतीला तीन दिवसाआड पाणी देण्यात येईल.सकाळी ११ वाजताच मनसे कार्यकर्ते महापालिकेसमोर दाखल झाले. त्यांनी ढोल वाजविणे सुरू केले. शहरात १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाण्याचा साठा होतो. काही भागांत पाचव्या व सहाव्या दिवशी पाणी का दिले जाते, असा सवाल त्यांनी केला. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर यापुढे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख विक्रम मांडुरके यांनी येत्या १५ दिवसांत कचऱ्याची समस्या सोडवू, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद, गजन गौडा, संतोष पवार, संकेत शेटे, अशोक पवार, भारत गायकवाड, राजेश पुरी, उमेश दीक्षित, सुरेंद्र वाडेकर, वंदना गाढे, अनिता लोमटे, लीला राजपूत, सपना ढगे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादWaterपाणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMNSमनसे