शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे साहित्य दुरुस्ती अभियान

By admin | Updated: May 29, 2014 00:22 IST

हिंगोली : मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील महावितरणची प्रचंड हानी झाली होती.

हिंगोली : मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील महावितरणची प्रचंड हानी झाली होती. त्यात झालेली नुकसानाची दुरूस्ती तसेच वीजगळती आणि वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने साहित्य नूतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. प्रामुख्याने हिंगोली शहरात ६ किलोमीटर अंतरावर एअर बेंच केबल टाकण्यात आले असून २७ कन्डक्टर बदलण्यात आले आहेत. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापर्यंत १ लाख ३९ हजार ६७७ ग्राहकांची संख्या होती. एकूण पाच विभागात वसमतमध्ये सर्वाधिक कनेक्शन आहेत. त्याखालोखाल हिंगोली उपविभागात ३० हजार ८३४ ग्राहकांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य कार्यालय असताना हिंगोली शहरात वीजगळती आणि चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्यामुळे महावितरणसमोर आव्हान निर्माण झाले आहे. म्हणून वाढत्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी फ्लार्इंग स्कॉडची नेमणूक करण्यात आली होती. फ्लाईंग स्कॉडचे काम सुरू असतानाही वीजचोरी घटलेली नाही. परिणामी हातबल झालेल्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी शेवटचा पर्याय म्हणून विद्युत तारांवर ‘एअर बंच केबल’ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चोरी अधिक असणार्‍या शहरातील सात नगरात १० किलो -मीटर अंतरावर गत महिन्यापासून केबल टाकल्या जात आहे. आजघडीला आझम कॉलनी, ख्वाजा कॉलनी, सिद्धार्थनगर, इंदिरानगर, खुशालनगर, गारमाळ आणि मंगळवारा भागात ६ किमीपर्यंत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने या भागात आकडा टाकता येणार नाही. थेट खांबावरून वीज घ्यावी लागणार असल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसला जाणार आहे. तांत्रिक गळती थांबविण्यासाठी सहा किमी अंतरावरील ११ केव्हीचे कन्डक्टर बदलण्यात येत आहेत. खराब झालेल्या ३० पैकी २७ वितरण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. सोबतच २०० केव्हीच्या १४ पैकी १२ वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. लोड वाढताच वारंवार होण्यार्‍या खंडीत विद्युत पुरवठ्यासाठी ‘एअर ब्रेक’ टाण्यात येत आहेत. २० ठिकाणी हे ब्रेक टाकण्यात येणार असून आजपर्यंत १७ ठिकाणचे काम पूर्णत्वास गेले आहे. शहरातील जुनाट तारा तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याही बदलण्यात येत आहे. नवीन साहित्य टाकणीचे काम लवकर पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील तांत्रिक गळती, वीजचोरीवर आळा बसणार आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता एम.एन.सिरसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच विभागात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये १ लाख ३९ हजार ६७७ ग्राहकांची होती नोंद. त्यातील वसमत उपविभागामध्ये सर्वाधिक ४७ हजार कनेक्शन असून त्याखालोखाल हिंगोली उपविभागात ३० हजार ८३४ ग्राहकांची होती नोंद.चोरी अधिक असणार्‍या शहरातील सात नगरांत १० किलोमीटर अंतरावर गत महिन्यापासून टाकल्या जात आहे केबल. आजघडीला आझम कॉलनी, खाजा कॉलनी, सिद्धार्थनगर, इंदिरानगर, खुशालनगर, गारमाळ आणि मंगळवारा भागात ६ किमीपर्यंत केबल टाकण्याचे काम झाले पूर्ण. तांत्रिक गळती थांबविण्यासाठी सहा किमी अंतरावरील ११ केव्हीचे कन्डक्टर येत आहेत बदलण्यात. खराब झालेल्या ३० पैकी २७ वितरण वाहिन्या बदलण्यात आल्या असून सोबतच २०० केव्हीच्या १४ पैकी १२ वाहिन्या आल्या आहेत बदलण्यात. हिंगोली शहरात १७ ठिकाणी टाकण्यात आले एअर ब्रेक.