शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:40 IST

शिवसेना गड परत मिळविण्याचे प्रयत्न करणार

ठळक मुद्देएमआयएम तुल्यबळ उमेदवाराच्या शोधातराष्ट्रवादी काँग्रेसला आले बळ

औरंगाबाद : शिवसेनाचा अभेद्य गड असलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमने सुरुंग लावला. सेना यंदा आपला गड परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. एमआयएम मागील निवडणुकीतील सातत्य यंदाही परत राखता येईल का, यादृष्टीने उमेदवाराची चाचपणी करीत आहे. राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष हा फॅक्टरही निवडणुकीत प्रभावीपणे काम करणार आहे. युती न झाल्यास भाजपचा उमेदवार असणार आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित नसले तरी येथे बहुरंगी लढत अटळ आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपने युती केली नव्हती. मत विभाजनाचा थेट फायदा एमआयएमला झाला होता. यंदाही मत विभाजन अटळ असल्याचे बोलले जात आहे. कालपर्यंत एमआयएमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी होती. ही आघाडी आज सोबत नाही. त्यामुळे एमआयएमच्या दृष्टीने ही कमकुवत बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात मुस्लिम चेहरा देणार आहे. त्यामुळे मतदारसंघ परत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएमची बरीच दमछाक होणार आहे. 

सेनेच्या गोटात काय?सेनेकडून प्रदीप जैस्वाल, सुहास दाशरथे, बाळू थोरात यांच्यासह ऐनवेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. प्रशांत किशोर यांनी सेनेसाठी केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात महापौरांना नागरिकांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. ‘मातोश्री’ने नवीन खेळी केल्यास मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटीलही संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. उमेदवारीचा कौल कोणाच्या बाजूने लागेल हे निश्चित नसले तरी सर्व काही इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. पितृपक्ष संपताच उमेदवारीची घोषणाही होणार आहे.

एमआयएम तुल्यबळ उमेदवाराच्या शोधातएमआयएम पक्षाला इम्तियाज जलील यांच्या माध्यमाने एक तुल्यबळ उमेदवार २०१४ मध्ये मिळाला. असाच उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. निवडणुकीत सेना-भाजप, राष्ट्रवादी, अपक्षांवर मात करील असा उमेदवार कोण, याचा अत्यंत बारकाईने पक्षाकडून शोध घेतला जात आहे. पक्षातील ३० पेक्षा अधिक इच्छुक यंदाही एमआयएमच्या लाटेवर स्वार होण्यासाठी उत्सुक आहेत. एमआयएमचे वादळ रोखण्यासाठी बंडखोरांसह राष्ट्रवादी, अपक्ष हा फॅक्टर प्रभावीपणे काम करणार आहे. सेनेकडून मिळविलेला मतदारसंघ यंदा परत आपल्याकडे ठेवणे हे एमआयएमसाठी सोपे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला आले बळशरद पवार यांनी औरंगाबादेत घेतलेला मेळावा आणि ईडीने दाखल केलेला गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मध्य विधानसभेत नवसंजीवनी देऊ शकतो. शरद पवार यांच्या पाठीशी तरुणाई अत्यंत खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मध्य विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कदीर मौलाना यांना बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास शरद पवार अत्यंत नवीन चेहऱ्यालाही संधी देऊ शकतात.

भाजपकडून ‘समांतर’ तयारीसेनेसोबत युती न झाल्यास भाजपला मध्यच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मागील एक महिन्यापासून भाजप बुथनिहाय, मतदार यादीनिहाय कामाला लागला आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि प्रदेश चिटणीस अनिल मकरिये यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपने केलेल्या चुका यंदा होणार नाहीत, याची काळजी पक्षाकडून घेतली जाईल, असे दिसते. हा मतदारसंघ मिळावा, यासाठीही प्रयत्न चालू आहेत. 

‘वंचित’कडून कामही सुरूमध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसुद्धा उमेदवार देणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक अमित भुईगळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. भुईगळ यांनी कामालाही सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितमध्ये युती होण्याची चिन्हे नाहीत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी