शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:49 IST

चहा पीत पीत होत असे उमेदवाराची निवड 

ठळक मुद्देदादासाहेब गणोरकर यांच्या घरातून हालत सूत्रे

औरंगाबाद : चाळीस वर्षांपूर्वी जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे गुलमंडीवरून हलायची. राजकारणातील किंगमेकर ठरलेले दादासाहेब गणोरकर यांचे निवासस्थान त्याकाळी निवडणुकीचा अड्डा होता. रात्री उशिरापर्यंत चहा पीत कोणाला उमेदवारी द्यायची, याविषयी खलबते चालत. काँग्रेसच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांचे नेते यात सहभागी होत असत. 

कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आता त्या त्या पक्षाचे हायकमांड ठरवत असतात. मात्र, एककाळ असा होता की, जिल्ह्यातील उमेदवार कोण हे येथील शहर, जिल्हा समितीच ठरवत असे. १९६० ते १९८० च्या दरम्यान दादासाहेब गणोरकर राजकारणात पॉवरफूल होते.  पत्रकार म्हणून काही वर्षे त्यांनी कामही केले. त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. काँग्रेसचे शहर, जिल्हा समितीचे सरचिटणीसपदही त्यांनी भूषविले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतेही पद घेतले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणूनच त्यांनी आपली भूमिका बजावली. त्यावेळेस शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे गुलमंडी होता आणि याच गुलमंडीवर गणोरकरांचे दुसऱ्या मजल्यावर निवासस्थान होते. तिथे समोरील बाजूस एक मोठी खोली होती. तिथे खिडकीत उभे राहिले की, संपूर्ण गुलमंडीचा चौक दिसत असे. हेच खोली त्यांची कार्यालय बनले होते.

याच ठिकाणी रात्री ९ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार येऊन बसत असत. जिल्ह्याचे राजकारणाची दिशा येथूनच ठरविली जात असे. येणाऱ्या प्रत्येकाला त्यावेळीस समाधान हॉटेल किंवा मेवाड हॉटेलमधून चहा आणला जात होता. रात्री उशिरापर्यंत चहा मिळत होता. चहापीत या ठिकाणी करमणुकीसाठी कधी कधी पत्त्याचे डावही रंगत असत. येथेच निवडणुकीच्या काळात उमेदवार ठरविला जात असे. काँग्रेसच्या शहर व जिल्हा समितीने ठरविलेल्या उमेदवार मग पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करीत असत. त्याकाळात दादासाहेब गणोरकरांचा शब्द अंतिम मला जात होता असे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक. ना.वी. देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यावेळेस गुलमंडीवर सर्व पक्षाचे नेतेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्रीही येत असत. ते आवर्जून गणोरकरांच्या निवासस्थान वजा कार्यालयात जात असत. त्यांची भेट घेतल्यानंतर गुलमंडी, राजाबाजार, शहागंज, सरस्वती भुवनच्या मैदान, एमपी लॉ कॉलेज किंवा आमखासच्या मैदानावर जाहीर सभा घेतली जात असे. त्यावेळीस काही बोटावर मोजण्याइतकेच लोकांकडे टेलिफोन असत त्यातील एक गणोरकर होते. त्यांच्याकडील फोन सतत खणखणत असतात.

राजकीय महत्त्वाचे निर्णय असले तर त्यांच्याच फोनवर सांगितला जात असे. यामुळे गणोरकरांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी जमत असत. त्याकाळात अनेकदा याच ठिकाणी पत्रकारांना हेडलाईन मिळत असत. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण त्या नंतर शरद पवारही खास गुलमंडीवर येऊन गेले होते. माजी मंत्री रफिक झकेरिया, अब्दुल आजीम, बाळासाहेब पवार, साहेबराव पाटील डोणगावकर, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह मराठवाड्यातील आमदार, खासदारही गुलमंडीवरील बैठकीत सहभागी होत असे. त्यावेळेस घनश्याम पानवालेचे पान प्रसिद्ध असे. रात्रीतून ५० पेक्षा अधिक पानांची आॅर्डर दिली जात होती. गणोरकरांची बैठकीत राजकीय गप्पाना उधाण येत असे. मात्र, १९८० नंतरच्या काळात त्यांनी हळूहळू राजकरणातून आपले अंग काढून घेतले आणि गुलमंडीवरचे राजकारणाचे केंद्र अन्यत्र सरकले. 

आदल्या रात्रीच ठरत असे दुसऱ्या दिवशीचे पवित्रेगुलमंडीवरील दादासाहेब गणोरकरांचे निवासस्थान म्हणजे जिल्ह्यातील राजकारणाचे मुख्य केंद्र होते. येथे स्वातंत्र्यसैनिकच नव्हे तर सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते येऊन बसत असे. रात्री ९ वाजेनंतर शहरातील व्यापारीही या बैठकीत सहभागी होत असे. चहा पीत गप्पा रंगत असे. दुसऱ्या दिवशीचे जिल्ह्यातील राजकारणाची दिशा आदल्या रात्री याच बैठकीत ठरविली जात होती. त्यावेळीस औरंगाबाद शहराचा आकारही मर्यादित होता. - ना. वि. देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण