शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 2:07 PM

औरंगाबाद पश्चिममध्ये निवडणूक होणार नागरी प्रश्नांवरच

ठळक मुद्देकाँग्रेसच्या उमेदवारीबाबत चित्र अस्पष्टच शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची तयारी

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना युतीबाबत घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांकडून लढण्याची तयारी सुरू आहे. 

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात  भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी आपला दावा आधीच ठोकला आहे. युती न झाल्यास शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध लढण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघात त्यांनी मोठे कार्यालयही थाटले आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

मागील पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भागाचे प्रश्न मांडल्याचे दिसत आहे. वाळूज महानगर आणि बजाजनगर परिसरातही त्यांच्या अनेक चकरा होऊन नागरिकांच्या भेटी झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रचार कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  शिवसेनेचे शहराचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, विद्यमान आमदार शिरसाट यांची त्या मानाने तयारी दिसत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांत त्यांचा जनसंपर्कही कमी झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच गोष्टी हेरून राजू शिंदे यांनी आपला जनसंपर्क वाढविला आहे. सातारा- देवळाईचे अनेक मुद्दे शिंदे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनेच महापालिकेत उपस्थित केल्याचे आता समोर येत आहे. युती न झाल्यास शिंदे यांचे आ. शिरसाट यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. 

औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून राजू शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आता आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आ. शिरसाट यांच्याशिवाय शिवसेनेतून इतरही अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसमध्ये काय?आघाडीमध्ये यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने लढविला आहे. २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार चंद्रभान पारखे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात दुसऱ्या स्थानी होते, तर २०१४ मध्ये जितेंद्र देहाडे हे काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे या मतदारसंघात वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे ही जागा अन्य पक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. ४मात्र, याबाबत निश्चित अशी माहिती समोर येत नाही. देहाडे यांच्यासह जयप्रकाश नारनवरे, पंकजा माने यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसचे औरंगाबाद शहरातील कार्यकर्ते ही जागा इतर पक्षाला सोडण्यात येऊ नये, असा आग्रह करीत आहेत. तूर्तास या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत स्पष्ट चित्र नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद