शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सामाजिक भान हरवले; औरंगाबादमध्ये केवळ ६ टक्के मालमत्तांमध्येच होतेय जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:32 PM

तीव्र पाणीटंचाई, तरी रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रचंड उदासीनता

ठळक मुद्देशहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण

औरंगाबाद : पाणीटंचाईवर मात करण्याच्या पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच जलपुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. अनेक जलतज्ज्ञ याबाबत नेहमी माहिती देतात आणि पर्यावरणप्रेमीही पाणी वाचवा म्हणतानाच ‘पाणी जिरवा’ असे कटाक्षाने सांगतात. असे असतानाही आणि यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण योजना राबविण्यात आली आहे. टक्केवारी काढल्यास हे प्रमाण अवघे ५ ते ६ टक्के असल्याचेच दिसून येते. ज्या घरांमध्ये जलपुनर्भरण योजना सुरू करण्यात आली आहे, अशा लोकांना महानगरपालिकेकडून मालमत्ता करात १० टक्के कर सवलत मिळते. याशिवाय अनेक सामाजिक संघटना कमीत कमी पैसे घेऊन जलपुनर्भरण योजना बसवून देत आहेत. एकदा हा प्रकल्प घरात बसविला की, अनेक वर्षे यासाठी पुन्हा काहीही पैसा खर्च करावा लागत नाही; परंतु असे असतानाही जलपुनर्भरण करणाऱ्या मालमत्तांची संख्या न वाढणे खेदजनक आहे.

यंदा अवघ्या ३५ घरांमध्ये प्रकल्पसकल मारवाडी मिडटाऊन महिला शाखेतर्फे मागील दोन वर्षांपासून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्यात येतो. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या ग्रुपकडून काम केले जात असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे काम केले जाते. याविषयी ग्रुपच्या सदस्या पूनम सारडा म्हणाल्या की, मागच्या वर्षी जवळपास २५० घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत हा उपक्रम सुरू केला. हे प्रमाण यावर्षी अत्यंत कमी झाले असून, यंदा अवघ्या ३० ते ३५ घरांमध्येच हा प्रकल्प सुरू झाला.  कचरा प्रश्नाविषयी आता औरंगाबादकर जागरूक झाले आहेत; पण पाण्याच्या बाबतीत मात्र  जागरूकता आली नसल्याचेही सारडा यांनी सांगितले. प्रीती भक्कड आणि भक्ती संकलेचा या ग्रुपच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा असून जलपुर्नभरण प्रकल्पासाठी सारडा यांच्यासह सुप्रिया सुराणा, भारती तोतला, अलका अग्रवाल प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहतात.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद