शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

साताऱ्यातील पोस्टात आधार कार्ड नोंदणीसाठी तारीख पे तारीख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 3:45 PM

कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जातेय

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : आधार कार्ड लिंक करा, त्यातील तांत्रिक दुरुस्ती किंवा नवीन कार्ड काढण्यासाठीचे अनधिकृत आधार कार्ड नोंदणी सेंटर शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांची लूट थांबली, असे असले तरी टपाल कार्यालयात आधार कार्डवरील दुरुस्ती वा नवीन नोंदणीसाठी तीन महिने वेटिंग आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

सातारा, देवळाई या दोन्ही वॉर्डांत ७५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असून, नागरिकांना सेवासुविधा संघर्षाशिवाय मिळत नाहीत. शाळा, कॉलेज प्रवेश, शासकीय योजना, बँक खाते उघडणे इत्यादी महत्त्वाच्या सेवासुविधांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. घाईगडबडीत काढलेल्या आधार कार्डवर चुका राहत असल्याने आॅनलाईन अर्ज भरताना आधार लिंक होत नाही. त्यामुळे अनेकांना योग्य स्पेलिंग जुळविण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते; परंतु त्याठिकाणीही आज सर्व्हर डाऊन आहे, तुम्ही उद्या या, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. 

शाळा, महाविद्यालयांना सुटीमुळे गर्दीशाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने विद्यार्थी व पालक आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती किंवा नवीन कार्ड बनविण्यासाठी सातारा टपाल कार्यालयात जातात; परंतु त्यांना काही तरी कारण सांगून तीन महिन्यांपुढची तारीख देऊन परत पाठविले जात आहे. तीन महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा या केंद्रावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  इतरत्र आधार केंद्रे बंद झाल्याने शासकीय यंत्रणा असलेल्या ठिकाणी नागरिकांना खात्रीलायकपणे नोंदणी व दुरूस्ती करता यावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे;परंतु येथे सोयी पेक्षा गेैरसोयीचे ठरत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणारआधार सेंटरविषयी येथील अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशीदेखील करण्यात आलेली आहे. सातारा टपाल कार्यालयातील तांत्रिक बाबी तपासणीसाठी मुख्यालयातून अधिकारी पाठविला जाणार आहे. या ठिकाणी गतिमान नवीन यंत्रणा बसविण्याचेही प्रयोजन आहे. या ठिकाणी भेट देऊन खरी परिस्थिती तपासणार आहोत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAdhar Cardआधार कार्डPost Officeपोस्ट ऑफिस