शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:04 IST

Lok Sabha Election 2024 : राज्यात ४० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असून देशात इंडिया आघाडी ३०० च्या वर जागांवर विजय मिळवेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  उद्या १ जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, या निकालावरुन आता राजकीय नेते दावे करत आहेत. दरम्यान, निकालाआधी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया आघाडीच्या मोठ्या विजयाचा दावा केला आहे. पटोले यांनी देशातील आणि राज्यातील विजयाचा आकडा सांगितला आहे. 

"राज्यात ४० जागांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. इंडिया आघाडी देशात ३०० जागांच्यावर जागा जिंकेल असं चित्र आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी आम्ही मोदींविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचे सांगितले होते. देशाचे संविधान सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचा अपमान केला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. 

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

"निवडणुकीच्या काळात सरकार मतदार राजाकडे मत मागायला गेली होती, त्याच काळात महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी पाच टप्प्यामध्ये आत्महत्या केल्या होत्या.   कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही याबाबत निवडणूक काळात मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधान मोदी यांना एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणाला म्हणून त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. म्हणजे शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, राज्यात कायदा सुव्यवस्था वाढली आहे. राज्यात दुष्काळही वाढला आहे. राज्यात ७५ टक्के भागात दुष्काळ आहे. टँकर माफिया घोटाळा करत आहेत, असंही पटोले म्हणाले. 

"मंत्री विदेशात, मुख्यमंत्री सुट्टीवर"

"मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत, अनेक मंत्री विदेशात गेले आहेत. अशा पद्धतीने राज्य चालत नाही. आम्ही उद्या तीन जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यानंतर आम्ही कमिशनर यांची भेट घेणार आहे. राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुष्काळ वाढला आहे. लोकांना भेटून याची माहिती घेणार आहे. भाजपा या गोष्टीला राजकारण म्हणातात. पण लोकांची भेट घेण गरजेचे आहे, असंही नाना पटोले म्हणाले. पुण्यात धंगेकर यांनी उचललेले प्रश्न सर्वसामान्यांसाठी घेतले आहेत. आम्ही सामान्यांसाठी लढायला तयार आहे, श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि सामान्यांसाठी वेगळा कायदा असं चालणार नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न उचलताना सरकारविरोधात लढायचं आहे, आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारे लोक आहोत, असंही नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४