शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:04 IST

Lok Sabha Election 2024 : राज्यात ४० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असून देशात इंडिया आघाडी ३०० च्या वर जागांवर विजय मिळवेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  उद्या १ जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, या निकालावरुन आता राजकीय नेते दावे करत आहेत. दरम्यान, निकालाआधी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया आघाडीच्या मोठ्या विजयाचा दावा केला आहे. पटोले यांनी देशातील आणि राज्यातील विजयाचा आकडा सांगितला आहे. 

"राज्यात ४० जागांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. इंडिया आघाडी देशात ३०० जागांच्यावर जागा जिंकेल असं चित्र आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी आम्ही मोदींविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचे सांगितले होते. देशाचे संविधान सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचा अपमान केला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. 

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

"निवडणुकीच्या काळात सरकार मतदार राजाकडे मत मागायला गेली होती, त्याच काळात महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी पाच टप्प्यामध्ये आत्महत्या केल्या होत्या.   कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही याबाबत निवडणूक काळात मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना पत्र लिहिलं आहे. पंतप्रधान मोदी यांना एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणाला म्हणून त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. म्हणजे शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, राज्यात कायदा सुव्यवस्था वाढली आहे. राज्यात दुष्काळही वाढला आहे. राज्यात ७५ टक्के भागात दुष्काळ आहे. टँकर माफिया घोटाळा करत आहेत, असंही पटोले म्हणाले. 

"मंत्री विदेशात, मुख्यमंत्री सुट्टीवर"

"मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत, अनेक मंत्री विदेशात गेले आहेत. अशा पद्धतीने राज्य चालत नाही. आम्ही उद्या तीन जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यानंतर आम्ही कमिशनर यांची भेट घेणार आहे. राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुष्काळ वाढला आहे. लोकांना भेटून याची माहिती घेणार आहे. भाजपा या गोष्टीला राजकारण म्हणातात. पण लोकांची भेट घेण गरजेचे आहे, असंही नाना पटोले म्हणाले. पुण्यात धंगेकर यांनी उचललेले प्रश्न सर्वसामान्यांसाठी घेतले आहेत. आम्ही सामान्यांसाठी लढायला तयार आहे, श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि सामान्यांसाठी वेगळा कायदा असं चालणार नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न उचलताना सरकारविरोधात लढायचं आहे, आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारे लोक आहोत, असंही नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४