शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 7:25 PM

सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी मतदानसेनेकडून भेटी-गाठी सुरु  

औरंगाबाद : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी  रिंगणात दोनच प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांशी कोणत्याही उमेदवाराने संपर्क साधला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री सेना उमेदवाराने काही एमआयएम नगरसेवकांची भेट घेतली. आज मध्यरात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मागील साडेचार वर्षांपासून मनपातील नगरसेवक चातकासारखी वाट पाहत होते. आपल्या कार्यकाळात ही निवडणूक होते किंवा नाही अशीही भीती अनेकांना वाटत होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आचारसंहिता लागू झाली. सेनेकडून अंबादास दानवे तर काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाले. निवडणूक रिंगणात दोघेच उमेदवार प्रमुख आहेत. अलीकडेच दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन ‘घोडेबाजार’ करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील पंधरा दिवसांपासून अपक्ष, एमआयएम नगरसेवकांची चलबिचल वाढली होती. दरम्यान, एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सदसद्विवेक बुद्धीने कोणालाही मतदान करा, अशी मुभा नगरसेवकांना दिली.

पक्षाने स्वातंत्र्य दिल्याने नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. निवडणूक रिंगणातील एकही उमेदवार त्यांच्याशी संपर्क करीत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी संपर्क न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निश्चयही एमआयएम नगरसेवकांनी व्यक्त केला होता. अखेर गुरुवारी रात्री सेना उमेदवार अंबादास दानवे यांनी कटकटगेट भागातील काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शुक्रवारी मध्यरात्री एका ठिकाणी सर्व एमआयएम नगरसेवक एकत्र बसणार आहेत. या बैठकीत अंतिम ‘निर्णय’होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अपेक्षित ‘मानपान’अशक्यऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी घोडेबाजार ठरलेला असतो. मागील दहा वर्षांमध्ये या निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना ही निवडणूक लढविणे अशक्य झाले होते. यंदा निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी घोडेबाजारच्या मुद्यावर युती केली. ४त्यानंतर सोयीनुसार घोडेबाजार सुरू केला. नगरसेवकांना अपेक्षित ‘मानपान’आज तरी मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद