शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अजिंठा, वेरूळ लेण्या उद्यापासून होणार खुल्या; ऑनलाईन नोंदणी द्वारे दिवसात २ हजार पर्यटकांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:18 IST

जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार

ठळक मुद्देदेवगिरी किल्ला, मकबरा, पाणचक्कीचा समावेश 

औरंगाबाद : कोरोनामुळे मार्च महिन्यातील २३ तारखेपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली होती. ती सर्व पर्यटनस्थळे गुरुवारपासून (दि. १०) खुली करण्यात येणार आहेत. आज अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला. २५७ दिवसांनंतर नागरिकांना जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणींसह बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. 

राज्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्यात आलेली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद होती. पर्यटनस्थळे गुरुवारपासून खुली होणार आहेत. प्रवेश कार्यक्रमावेळी राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मागील नऊ महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक, गाईड, पर्यटक आदींचा विचार करत अटी व शर्तींसह अजिंठा लेणीमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश देण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, मात्र येथील सर्व व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीकोनातून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर कटाक्षाने करणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. येथील नियमांचे पालन जगभर जाणार असल्याने त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. तसेच अजिंठा लेणी परिसरात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणीही लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले. 

पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून होती मागणी : गाईडसह लहान-मोठे हॉटेल्स चालक, टॅक्सी व्यवसाय आणि पर्यटन सेवा देणाऱ्या संस्थांसह अनेकांच्या रोजगारावर मागील १० महिन्यांपासून कोरोनामुळे गदा आलेली आहे. स्थानिक पातळीवरील पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचना होत्या. पर्यटनस्थळावरील कर्मचारी, गाईड यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. आज बुधवारी (दि. ९) सर्व पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मागील ९ महिन्यांपासून ती पर्यटनस्थळे बंद आहेत. आतमध्ये स्वच्छता झालेली नसेल. तसेच काही पक्षी, प्राणी आत असतील, तर त्यांना जेरबंद करावे लागेल. सगळी सुरक्षेची खबरदारी घेऊन पर्यटनस्थळांमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश खुला होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. 

मर्यादित पर्यटकांना प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यकजगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार असून, दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार, अशा २ हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकीट मिळणार नाही. 

बस फेऱ्या वाढविण्याचे आदेशमास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी, तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागाने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ, अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळAbdul Sattarअब्दुल सत्तार