शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अजिंठा, वेरूळ लेण्या उद्यापासून होणार खुल्या; ऑनलाईन नोंदणी द्वारे दिवसात २ हजार पर्यटकांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:18 IST

जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार

ठळक मुद्देदेवगिरी किल्ला, मकबरा, पाणचक्कीचा समावेश 

औरंगाबाद : कोरोनामुळे मार्च महिन्यातील २३ तारखेपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली होती. ती सर्व पर्यटनस्थळे गुरुवारपासून (दि. १०) खुली करण्यात येणार आहेत. आज अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला. २५७ दिवसांनंतर नागरिकांना जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणींसह बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. 

राज्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्यात आलेली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद होती. पर्यटनस्थळे गुरुवारपासून खुली होणार आहेत. प्रवेश कार्यक्रमावेळी राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मागील नऊ महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक, गाईड, पर्यटक आदींचा विचार करत अटी व शर्तींसह अजिंठा लेणीमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश देण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, मात्र येथील सर्व व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीकोनातून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर कटाक्षाने करणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. येथील नियमांचे पालन जगभर जाणार असल्याने त्रिसूत्रीचा अवलंब आवश्यक आहे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. तसेच अजिंठा लेणी परिसरात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणीही लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले. 

पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून होती मागणी : गाईडसह लहान-मोठे हॉटेल्स चालक, टॅक्सी व्यवसाय आणि पर्यटन सेवा देणाऱ्या संस्थांसह अनेकांच्या रोजगारावर मागील १० महिन्यांपासून कोरोनामुळे गदा आलेली आहे. स्थानिक पातळीवरील पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचना होत्या. पर्यटनस्थळावरील कर्मचारी, गाईड यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. आज बुधवारी (दि. ९) सर्व पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. मागील ९ महिन्यांपासून ती पर्यटनस्थळे बंद आहेत. आतमध्ये स्वच्छता झालेली नसेल. तसेच काही पक्षी, प्राणी आत असतील, तर त्यांना जेरबंद करावे लागेल. सगळी सुरक्षेची खबरदारी घेऊन पर्यटनस्थळांमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश खुला होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. 

मर्यादित पर्यटकांना प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यकजगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार असून, दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार, अशा २ हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकीट मिळणार नाही. 

बस फेऱ्या वाढविण्याचे आदेशमास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी, तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागाने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ, अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळAbdul Sattarअब्दुल सत्तार