इसापूरचे पाणी पैनगंगेला सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:31 IST2016-04-22T00:26:16+5:302016-04-22T00:31:42+5:30
हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल,

इसापूरचे पाणी पैनगंगेला सोडा
हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असे तालुका काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी सांगितले़
तालुक्यातील कामारी, दिघी, विरसनी, घारापूर, टेंभुर्णी, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, हिमातयगनर, मंगरूळ, खैरका आदी गावांत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली़ इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडल्यास विहीर, बोअरला बऱ्यापैकी पाणी येईल़ जनावरे, जंगली प्राणी यांचीही समस्या सुटेल, असे देवसरकर यांनी सांगितले़
माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पाटील, जि़प़सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमिटी सभापती दत्तराम करंजीकर, नगराध्यक्ष अब्दुल अखिल, अनिल पाटील, रफीकसेठ, शेख रहीम, अन्वरखाँ पठाण, जोगेंद्र नरवाडे, अशोक शिरफुले, राऊत, राजू पाटील, गणेश अडबलवार, मधु राठोड, अशोक राठोड, दगडू काईतवाड, विश्वासराव वानखेडे, पंडित रावते, प्रल्हाद टेंभुर्णीकर, वामनराव वानखेडे, डॉ़प्रकाश वानखेडे, बळीराम देवकत्ते, गणेशराव शिंदे, भगवानराव खंदारे, माधवराव पाटील आदींच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार आहे़ (वार्ताहर)