शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

६०% वरील पाणी जायकवाडीत सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:04 IST

जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.

ठळक मुद्देहरिभाऊ बागडे : ‘सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ परिसंवादात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स (इंडिया)आणि सिंचन सहयोगतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात ‘जायकवाडी प्रकल्प : सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ या विषयावर आयोजित परिसंवादात उद््घाटक म्हणून हरिभाऊ बागडे बोलत होते. व्यासपीठावर ‘आय.ई.आय’चे अध्यक्ष डॉ. एस.डी. देशमुख, सचिव अशोक ससाणे, सिंचन सहयोगचे अध्यक्ष ई.बी. जोगदंड, सचिव पी.डी. वझे व मिलिंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, प्रा. प्रदीप पुरंदरे, विजयअण्णा बोराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. भर्गोदेव, शंकरराव नागरे, बापू अडकिणे आदींची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिसंवादाचे उद््घाटन झाले.हरिभाऊ बागडे म्हणाले की, सिंचन आणि समन्यायी पाणीवाटप यामध्ये समन्यायी हा शब्द शेतकºयांसाठी आहे, की राज्यासाठी लागू आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जायकवाडीतील पाणी व्यवस्थित वापरले जावे. यापुढे मोठी धरणे होणार नाहीत. मध्यम प्रकल्प, पाझर तलावांसाठी जमीन उपलब्ध होऊ शकणार नाही. जलवाहिनीद्वारे शेतापर्यंत पाणी दिले पाहिजे. धरणातील पाणी कधी सोडायचे, याचे गणित बसविले पाहिजे. नाशिक जिल्ह्यांत मराठवाड्यासाठीचे धरण झाले. जायकवाडी गाळाने भरत असल्याने वर पाणी साठविले तर उपयोग होईल, हाच निकष त्यावेळी होता. ही चांगली कल्पना होती; परंतु ज्यांच्या भागात धरण आहे ते पाणी देऊ देत नाही, हा आता प्रश्न आहे. पावसाळ्यातच पाणी सोडले, तर पाणी वाया जात नाही. नदी कोरडी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाणी सोडले, तर खालच्या धरणात अर्धे पाणीही येण्याची शक्यता नसते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.ज्यांच्यासाठी धरण, तेच अडचणीतडॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जायकवाडी प्रकल्प पाणी नियोजन व सद्य:स्थिती’वर परिसंवाद झाला. यावेळी भर्गोदेव म्हणाले की, जायकवाडीत सध्या एकही नियमित अधिकारी नाही. एकेकाकडे चार-चार शाखा आहेत. ६० ते ७० टक्के पदे रिक्त आहेत. जायकवाडीच नव्हे, राज्यभर हेच चित्र आहे. चार वर्षांतून एकदाच पुरेसे पाणी येते. परिणामी, ज्या शेतकºयांसाठी धरण बांधले त्यांचीच अडचण होते. कोणते पीक घ्यावे, याचे नियोजनच करता येत नाही. समन्यायी म्हणजे काय, याचा खेळ सुरू आहे. समस्या एक आणि इलाज दुसराच होत आहे. शंकरराव नागरे म्हणाले की, गाळाच्या नावाखाली धरणांची क्षमता कमी दाखविली जाते. सोडलेल्या पाण्याचा हिशोबच ठेवला जात नाही. त्यामुळे पाण्याची चोरीचा आरोप होतो.... अन् माईकचा पुन्हा ताबालग्नसमारंभात आॅर्केस्ट्रापेक्षा तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवले पाहिजे, असे बागडे म्हणाले. त्यांच्या मनोगतानंतर, पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्यासाठी होणाºया कामांमुळे धरणात पाणी येत नसल्याचे सूत्रसंचालकाने म्हटले. यावर बागडेंनी पुन्हा माईकचा ताबा घेत तात्काळ उत्तर दिले.धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या ८० ते ९० टक्के लोकांचा विचार केला पाहिजे. पाझर तलाव बांधायचे नाहीत, हा समग्र विचार होत नाही. नाही तर मग जायकवाडी धरणातील पाणी सिल्लोडला येऊ द्या, असे बागडे म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे