शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

६०% वरील पाणी जायकवाडीत सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:04 IST

जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.

ठळक मुद्देहरिभाऊ बागडे : ‘सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ परिसंवादात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स (इंडिया)आणि सिंचन सहयोगतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात ‘जायकवाडी प्रकल्प : सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ या विषयावर आयोजित परिसंवादात उद््घाटक म्हणून हरिभाऊ बागडे बोलत होते. व्यासपीठावर ‘आय.ई.आय’चे अध्यक्ष डॉ. एस.डी. देशमुख, सचिव अशोक ससाणे, सिंचन सहयोगचे अध्यक्ष ई.बी. जोगदंड, सचिव पी.डी. वझे व मिलिंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, प्रा. प्रदीप पुरंदरे, विजयअण्णा बोराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. भर्गोदेव, शंकरराव नागरे, बापू अडकिणे आदींची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिसंवादाचे उद््घाटन झाले.हरिभाऊ बागडे म्हणाले की, सिंचन आणि समन्यायी पाणीवाटप यामध्ये समन्यायी हा शब्द शेतकºयांसाठी आहे, की राज्यासाठी लागू आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जायकवाडीतील पाणी व्यवस्थित वापरले जावे. यापुढे मोठी धरणे होणार नाहीत. मध्यम प्रकल्प, पाझर तलावांसाठी जमीन उपलब्ध होऊ शकणार नाही. जलवाहिनीद्वारे शेतापर्यंत पाणी दिले पाहिजे. धरणातील पाणी कधी सोडायचे, याचे गणित बसविले पाहिजे. नाशिक जिल्ह्यांत मराठवाड्यासाठीचे धरण झाले. जायकवाडी गाळाने भरत असल्याने वर पाणी साठविले तर उपयोग होईल, हाच निकष त्यावेळी होता. ही चांगली कल्पना होती; परंतु ज्यांच्या भागात धरण आहे ते पाणी देऊ देत नाही, हा आता प्रश्न आहे. पावसाळ्यातच पाणी सोडले, तर पाणी वाया जात नाही. नदी कोरडी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाणी सोडले, तर खालच्या धरणात अर्धे पाणीही येण्याची शक्यता नसते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.ज्यांच्यासाठी धरण, तेच अडचणीतडॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जायकवाडी प्रकल्प पाणी नियोजन व सद्य:स्थिती’वर परिसंवाद झाला. यावेळी भर्गोदेव म्हणाले की, जायकवाडीत सध्या एकही नियमित अधिकारी नाही. एकेकाकडे चार-चार शाखा आहेत. ६० ते ७० टक्के पदे रिक्त आहेत. जायकवाडीच नव्हे, राज्यभर हेच चित्र आहे. चार वर्षांतून एकदाच पुरेसे पाणी येते. परिणामी, ज्या शेतकºयांसाठी धरण बांधले त्यांचीच अडचण होते. कोणते पीक घ्यावे, याचे नियोजनच करता येत नाही. समन्यायी म्हणजे काय, याचा खेळ सुरू आहे. समस्या एक आणि इलाज दुसराच होत आहे. शंकरराव नागरे म्हणाले की, गाळाच्या नावाखाली धरणांची क्षमता कमी दाखविली जाते. सोडलेल्या पाण्याचा हिशोबच ठेवला जात नाही. त्यामुळे पाण्याची चोरीचा आरोप होतो.... अन् माईकचा पुन्हा ताबालग्नसमारंभात आॅर्केस्ट्रापेक्षा तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवले पाहिजे, असे बागडे म्हणाले. त्यांच्या मनोगतानंतर, पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्यासाठी होणाºया कामांमुळे धरणात पाणी येत नसल्याचे सूत्रसंचालकाने म्हटले. यावर बागडेंनी पुन्हा माईकचा ताबा घेत तात्काळ उत्तर दिले.धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या ८० ते ९० टक्के लोकांचा विचार केला पाहिजे. पाझर तलाव बांधायचे नाहीत, हा समग्र विचार होत नाही. नाही तर मग जायकवाडी धरणातील पाणी सिल्लोडला येऊ द्या, असे बागडे म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे