शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 18, 2014 00:49 IST

भूम : मे महिना सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून, जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागतीही जवळपास पूर्ण केल्या आहेत.

 भूम : मे महिना सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून, जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागतीही जवळपास पूर्ण केल्या आहेत. सध्या शेतकरी खते, बी-बियाणे यासाठी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात खरिपाचे ३८ हजार ८० हेक्टर सरासरी क्षेत्र असून, गतवर्षीच्या खरीप हंगामात ४६०० हेक्टरवर कापूस तर ६५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. या दोन्ही पिकामधून चांगले उत्पादन झाल्याने यंदा कापसाचे क्षेत्र ९ हजार तर सोयाबीनचे ८५०० हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासाठी वेळेवर बी-बियाणे, खते मिळणे व पाऊस होणे गरजेचे आहे. दरम्यान, यंदा कापूस लागवडीसाठी सर्व कंपन्यांच्या बियाणांचे ३६ हजार पाकिटे मागविण्यात आले असून, याचा पुरवठाही सुरू असल्याचे पंचायत समिती कृषी विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, सोयाबीन बियाणाचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना स्वत:च्या शेतातील बियाणाचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, सोयाबीन बियाणाची पेरणी करण्यापूर्वी शेतकर्‍यांनी त्याची घरच्याघरी उगवण क्षमता तपासून पहावी, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे. यासाठी एका कुंडीत शंभर बिया टाकल्यानंतर ४८ तासात यार्पीिं ७० बिया उगवून आल्या तर एकरी २५ किलो बियाणे पेरणी करावे तर साठ बियाणांची उगवण झाल्यास ३० किलोची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर) कृषी खात्याकडून तीन फेर्‍यांत मार्गदर्शन खरीप पेरणीपूर्व तयारीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तीन फेर्‍यात मार्गदर्शन करण्यात येत आहे. याला १२ मे पासून सुरूवात झाली असून, ६ जूनपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे. यात शेती पिकाची लागवड, पीक विमा, अंतरपीक पध्दती, घरगुती सोयाबीन बियाणाचा वापर, जैविक खतांचा वापर आदींबाबत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी हे गावागावात जावून मार्गदर्शन करीत आहेत. अशी आहे बियाणांची मागणी बाजरी १०५ क्विंटल, तूर ९०४ क्विंटल, मूग १८० क्विंटल, उडीद ५२५ क्विंटल, सोयाबीन ५५२५ क्विंटल, सूर्यफूल ३५० क्विंटल, कापूस ३६४०० क्विंटल. गुणवत्तापूर्व निविष्ट शेतकर्‍यांना मिळण्यासाठी तालुकस्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार आहेत. बियाणांचा काळा बाजार आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी अधिकारी संजीवन दराडे यांनी दिला. सतत हवामानात बदल होत असल्याने प्रत्येक शेतकर्‍यांनी लावलेली पिके विमा संरक्षित करावीत. तसेच पाऊसमान अनियमित असल्याने उताराला आडवी पेरणी करावी. यामुळे कमी पावसावर देखील उत्पादन चांगले उत्पादन मिळू शकेल.