शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:27 IST

शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत.

- विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांडे यांनी सुरू केलेल्या उपोषण आणि तेथे पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. मराठवाड्यातील कुणबी (मराठा) समाजाला निजामकाळात आरक्षण लागू होते. तेच आरक्षण लागू करावे, यासह इतर मागण्यांसाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात माहिती घेतली जात आहे. विभागात सर्व मिळून ८ हजार ५५० गावे असून, सर्व ठिकाणच्या खासरा नोंदी, सातबारा, महसुली नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज व इतर कागदपत्रे, वंशावळ व इतर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सोमवारी जेवढी माहिती उपलब्ध झाली ती ७०० पानांच्या अहवालरूपाने शासनाला सादर केली. अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती यासाठी नेमली असून, महिन्याभरात माहिती संकलन करण्यात येणार आहे. संशोधनासाठी ७५ वर्षांपूर्वीच्या काळातील तथ्य संकलन महत्त्वाचे ठरणार असून, कोतवाल पंची, चारसाल पत्र, खासरा पत्र, सातबारा यातून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकेल. सध्या दीड लाखांच्या आसपास सातबारा आहेत. तेवढ्याच प्रमाणात खासरा पत्रांचे अभिलेख असण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री व समितीमध्ये काय चर्चा झाली.....१९५१ पासून पुढील दस्तांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे आढळत आहेत. भूमिअभिलेख, शैक्षणिक, महसूल, गॅझेटीयर याची वेगवेगळ्या टप्प्यांवर माहिती संकलित करण्यात येणार आहे. २९ मेच्या अध्यादेशानुसार हे सर्व होईल. १९३२ पर्यंत जातीनिहाय जनगणनेचे संदर्भ आहेत. आदी मुद्द्यांवर आज प्राथमिक चर्चा झाली. मंगळवारी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. शैक्षणिक नोंदी, निजामकालीन सनदी, करार, वंशावळींच्या माहितीवर चर्चा होणार आहे, असे विभागीय आयुक्त आर्दड यांनी सांगितले.

हैदराबादलामधील अभिलेख तपासणार....डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील दस्त तपासले जाणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्त होण्यापूर्वीचे काही दस्त हैदराबादमध्ये असून, ते उर्दूमध्ये आहेत. त्याचीही तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी यासाठी विशेष पथक गठित करणार आहेत. अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. जालना जिल्ह्याची बहुतांश माहिती समितीकडे आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सातबारा कधीपासून....१९१० साली जमिनीच्या मोजणीसह अभिलेख तयार करून क्षेत्रनिहाय क्रमांक दिला गेला. त्याला सर्व्हे नंबर म्हटले गेले. सध्या भूमिअभिलेखात १९२६ पासूनच्या पुढील अभिलेख तपासले जातात. १९३२ पर्यंत जातीनिहाय जनगणनेचे संदर्भ आढळत आहेत. त्यानंतर निजामकाळात खासरा पत्रावरून चारसाल पत्र करवसुलीसाठी करण्यात आले. १९६०च्या नंतर सातबारा तयार होण्यास सुरुवात झाली.

निजामाच्या काळात काय होते...मराठवाड्यात १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत खासरा पत्रावरच जमीन मालक, जात, वारसांचा उल्लेख होता. त्यानंतर पुढील काळात १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर सातबारा हा दस्त भूमिअभिलेखासाठी तयार करण्यात आला. पुढे १९६६ नंतर महसूल अधिनियमानुसार भूमिअभिलेखांत बदल होत गेले. या सगळ्या दस्तांमध्ये खासरा हा पुरावा जातप्रमाणपत्रांसाठी महत्त्वाचा मानला जातो.

कोणत्या जिल्ह्यात आढळले पुरावे....औरंगाबाद : औरंगाबाद, पैठण, कन्नड, फुलंब्री, गंगापूरजालना : घनसावंगी, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना, अंबडनांदेड : किनवट, माहूर, हदगावबीड : पाटोदा, शिरूर कासार, आष्टीउस्मानाबाद : उमरगा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादBeedबीडMarathwadaमराठवाडाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण