शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दात्यांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी काम करा: पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:02 IST

किडनी दात्यांचा हृद्य सत्कार सोहळा, तज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली

छत्रपती संभाजीनगर : ‘माझी किडनी बदलली आहे...’ हे सांगणे बंद करावे. किडनी बदलल्याने आयुष्य चांगले होते, खराब होत नाही. ज्या दात्याने किडनी दिली, त्यांचा आदर म्हणून योग्य वर्तणूक ठेवावी. दात्याने स्वत:ची किडनी देऊन त्याग केलेला असतो. त्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी चांगले काम केले पाहिजे. हे आयुष्य जगण्यासाठी आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिणीने किडनी देऊन जी ऊर्जा दिली आहे, ती तेवत ठेवा. इतर लोक किडनी दान करण्यासाठी पुढे येतील यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले.

जागतिक किडनी दिनानिमित्त नेफ्राॅन किडनी केअरतर्फे रविवारी एपीआय काॅर्नर येथील एका लाॅनवर आयोजित किडनी दात्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. व्यासपीठावर सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटलचे प्रशासक डाॅ. हिमांशू गुप्ता, ओरिऑन सिटी केअर हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील जाधव, मुख्य व्यवस्थापकीय संचालक डाॅ. आशिष देशपांडे, कमलनयन बजाज हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जाॅर्ज फर्नांडिस, मेडिकव्हर हाॅस्पिटलचे डाॅ. संदीप ठाकूर, डाॅ. आनंद देशमुख, प्रा. भागवत कटारे, कार्यक्रमाचे आयोजक डाॅ. श्रीगणेश बर्नेला, डाॅ. सचिन सोनी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. किडनी दात्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.

डाॅ. लहाने म्हणाले, किडनी दिली आहे आणि घेतली आहे, असे म्हणून दिव्यांग करू नका. एका किडनीवरही व्यक्ती सशक्त राहतो. जेव्हा आपण दुसऱ्याच्या कामाला येतो, तेव्हा तो माणूस आशीर्वाद देतो. हा आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतो. २९ वर्षांपूर्वी आईने मला किडनी दिली. माझा हा दुसरा जन्म ठरला. हा जन्म लोकांसाठी अर्पण केला. डाॅ. श्रीगणेश बर्नेला, डाॅ. सचिन सोनी यांनी प्रास्ताविकात सोहळ्यामागील भूमिका विशद केली.

किडनीच्या तंदुरुस्तीसाठी पेन किलर घेणे बंद करा- राजेंद्र दर्डाकिडनी खराब झाली, डायलिसिस सुरू केले, असे आपल्याला नेहमी ऐकू येते. मग येते किडनी प्रत्यारोपणाची वेळ. मात्र, किडनी सहजासहजी उपलब्ध होत नाही, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी केले. १९७१ साली भारतात पहिल्यांदा यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण झाले. त्याला ५३ वर्षे उलटून गेली आहेत. वैद्यकीय ज्ञान वाढले, तंत्रज्ञान बदलले. भारतात दरवर्षी साधारण २ लाख २० हजार रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, त्यातील थोड्याच रुग्णांना किडनी मिळते. किडनीची आवश्यकता आणि उपलब्धता, यातील तफावत दूर होण्यासाठी जनजागृती हे एकमेव उत्तर आहे. प्रत्येकाला दोन किडनी असतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका किडनीवरही व्यक्ती उत्तम आयुष्य जगू शकतो. याविषयी जनजागृती झाली पाहिजे. गेल्या वर्षी शहरात १४८ किडनी प्रत्यारोपण झाले. ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानातून आतापर्यंत ७० रुग्णांना किडनी मिळाली. हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. रक्तदाब, शुगर, वजन सांभाळले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. भरपूर पाणी प्यावे. स्वत:च्या मनाने पेन किलर घेऊ नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर