शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खुलताबादकरांना दुष्काळात पाणी मिळणार; गंधेश्वर ते गिरिजा प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:15 IST

या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

ठळक मुद्दे गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लकहा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल

खुलताबाद (औरंगाबाद ) : गेल्या सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या खुलताबादकरांसाठी शासनाने तातडीने मंजूर केलेली गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प ही पाणीपुरवठा योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या गुरुवारपासून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन दुष्काळात पाणी मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या गंधेश्वर प्रकल्पात ०.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, या पाणीसाठ्यावर महिनाभर भागविले जाऊ शकते.  येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, शासनाने तातडीने खुलताबाद शहर व इतर गावांसाठी टंचाईग्रस्त विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये निधी गंधेश्वर धरणातून गिरिजा मध्यम प्रकल्पापर्यंत (२५ कि.मी.) पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला मंजुरी दिली होती. गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या चारीत टाकून ते खुलताबादकरांना पुरवठा करण्यात येणार असून, गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

दरम्यान, सध्या गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल, असा विश्वास पाटबंधारे सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प पाणीपुरवठा योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मच्छिंद्र लिंगायत, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता सचिन तोंडेवाड, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,  पाटबंधारे सिंचन विभागाच्या अधिकारी हजर होते.

एक्स्प्रेस फिडरचे  काम पूर्णत्वाकडे आता पाईपलाईनचे काम पूर्ण होत आले असून, एक-दोन दिवसांत महावितरणचे एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण होणार असल्याने ही पाणीपुरवठा योजना गुरुवारपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.च्ऐन दुष्काळात सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने खुलताबादकरांना काही प्रमाणात पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबादWaterपाणी