शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

खुलताबादकरांना दुष्काळात पाणी मिळणार; गंधेश्वर ते गिरिजा प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:15 IST

या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

ठळक मुद्दे गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लकहा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल

खुलताबाद (औरंगाबाद ) : गेल्या सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या खुलताबादकरांसाठी शासनाने तातडीने मंजूर केलेली गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प ही पाणीपुरवठा योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या गुरुवारपासून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन दुष्काळात पाणी मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या गंधेश्वर प्रकल्पात ०.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, या पाणीसाठ्यावर महिनाभर भागविले जाऊ शकते.  येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, शासनाने तातडीने खुलताबाद शहर व इतर गावांसाठी टंचाईग्रस्त विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये निधी गंधेश्वर धरणातून गिरिजा मध्यम प्रकल्पापर्यंत (२५ कि.मी.) पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला मंजुरी दिली होती. गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या चारीत टाकून ते खुलताबादकरांना पुरवठा करण्यात येणार असून, गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

दरम्यान, सध्या गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल, असा विश्वास पाटबंधारे सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प पाणीपुरवठा योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मच्छिंद्र लिंगायत, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता सचिन तोंडेवाड, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,  पाटबंधारे सिंचन विभागाच्या अधिकारी हजर होते.

एक्स्प्रेस फिडरचे  काम पूर्णत्वाकडे आता पाईपलाईनचे काम पूर्ण होत आले असून, एक-दोन दिवसांत महावितरणचे एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण होणार असल्याने ही पाणीपुरवठा योजना गुरुवारपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.च्ऐन दुष्काळात सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने खुलताबादकरांना काही प्रमाणात पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबादWaterपाणी