शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

खुलताबादकरांना दुष्काळात पाणी मिळणार; गंधेश्वर ते गिरिजा प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:15 IST

या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

ठळक मुद्दे गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लकहा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल

खुलताबाद (औरंगाबाद ) : गेल्या सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या खुलताबादकरांसाठी शासनाने तातडीने मंजूर केलेली गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प ही पाणीपुरवठा योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या गुरुवारपासून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन दुष्काळात पाणी मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या गंधेश्वर प्रकल्पात ०.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, या पाणीसाठ्यावर महिनाभर भागविले जाऊ शकते.  येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, शासनाने तातडीने खुलताबाद शहर व इतर गावांसाठी टंचाईग्रस्त विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये निधी गंधेश्वर धरणातून गिरिजा मध्यम प्रकल्पापर्यंत (२५ कि.मी.) पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला मंजुरी दिली होती. गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या चारीत टाकून ते खुलताबादकरांना पुरवठा करण्यात येणार असून, गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू  होते.

दरम्यान, सध्या गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल, असा विश्वास पाटबंधारे सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प पाणीपुरवठा योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मच्छिंद्र लिंगायत, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता सचिन तोंडेवाड, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,  पाटबंधारे सिंचन विभागाच्या अधिकारी हजर होते.

एक्स्प्रेस फिडरचे  काम पूर्णत्वाकडे आता पाईपलाईनचे काम पूर्ण होत आले असून, एक-दोन दिवसांत महावितरणचे एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण होणार असल्याने ही पाणीपुरवठा योजना गुरुवारपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.च्ऐन दुष्काळात सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने खुलताबादकरांना काही प्रमाणात पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबादWaterपाणी