शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:44 IST

१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील ३ महिन्यांत झालेल्या अतिपावसामुळे विभागातील ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. असे असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना अद्याप गती मिळालेली नाही. ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे सध्या पूर्ण झाले आहेत. ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे अजून बाकी आहेत. १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात आल्याचे विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या, धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे.

विभागातील ५० टक्के उत्पादन घटणारविभागातील ८ हजार ५५० गावांपैकी सुमारे ४ हजार गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील खरिपाचे ५० टक्के उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम आगामी काळातील महागाई वाढण्यावर होण्याची शक्यता आहे.

पिकांचे नुकसान असेजिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टरबागायत...३ हजार ८९ हेक्टरफळपीक...६ हजार ८७८ हेक्टरएकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर

किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसानजिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामेछत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्केजालना.....................१८४................२७६५९...............०० टक्केपरभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्केहिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्केनांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्केबीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्केलातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्केधाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्केएकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के

२८९५ मालमत्तांचे नुकसानअतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८९५ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या. ४१५ मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. २८९५ मालमत्तांची अशंत: पडझड झाली आहे. ७२ झाेपड्या पुरात वाहून गेल्या. २५६ जनावरांचे गोठेही पडले. तर १ हजार ४९ सर्व प्रकारांतील जनावरांचा मृत्यू अतिवृष्टीत झाला. ५० व्यक्ती पुरात वाहून व वीज पडून दगावल्या.

टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्र