शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
4
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
5
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
6
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
7
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
8
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
9
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
10
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
11
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
12
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
13
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
14
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
15
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
16
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
17
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
18
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
19
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
20
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:44 IST

१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील ३ महिन्यांत झालेल्या अतिपावसामुळे विभागातील ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. असे असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना अद्याप गती मिळालेली नाही. ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे सध्या पूर्ण झाले आहेत. ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे अजून बाकी आहेत. १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात आल्याचे विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या, धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे.

विभागातील ५० टक्के उत्पादन घटणारविभागातील ८ हजार ५५० गावांपैकी सुमारे ४ हजार गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील खरिपाचे ५० टक्के उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम आगामी काळातील महागाई वाढण्यावर होण्याची शक्यता आहे.

पिकांचे नुकसान असेजिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टरबागायत...३ हजार ८९ हेक्टरफळपीक...६ हजार ८७८ हेक्टरएकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर

किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसानजिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामेछत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्केजालना.....................१८४................२७६५९...............०० टक्केपरभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्केहिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्केनांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्केबीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्केलातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्केधाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्केएकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के

२८९५ मालमत्तांचे नुकसानअतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८९५ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या. ४१५ मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. २८९५ मालमत्तांची अशंत: पडझड झाली आहे. ७२ झाेपड्या पुरात वाहून गेल्या. २५६ जनावरांचे गोठेही पडले. तर १ हजार ४९ सर्व प्रकारांतील जनावरांचा मृत्यू अतिवृष्टीत झाला. ५० व्यक्ती पुरात वाहून व वीज पडून दगावल्या.

टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्र