शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

खरीप पिकांना मिळाले जीवदान; अनेक दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाची पुन्हा एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 12:11 PM

Rain in Marathwada : गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देअधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.भिज पावसामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले

औरंगाबाद : अनेक दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दुबारपेरणीचे संकट आ वासून उभे होते. मात्र, वरुणराजाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ( Kharif crops get life saving as rain re-renter in Marathwada ) 

परभणी जिल्ह्यात १५ दिवसांच्या खंडानंतर बुधवारी रात्री झालेल्या भिज पावसामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. तालुक्याच्या ग्रामीण भागात ४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.

१६ व्या दिवशी बरसलाकौठा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात पेरणीनंतर पाऊस गायबच झाला होता. तब्बल १६ व्या दिवशी पाऊस बरसला. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, हळद इत्यादी पिके अक्षरशः वाळत होती. अगोदरच मागील वर्षापासून सतत कोरोना, टाळेबंदी, पिकांना भाव नाही अशा संकटांनी शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैतागून गेला आहे. त्यातच आता पुन्हा पाऊस वेळेवर नसल्याने नवेच संकट उभे राहिले होते.

नांदेड जिल्ह्यात ३६.२ मि.मी. पाऊसनांदेड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद भोकर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात होती. बुधवारी रात्री उशिरा पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २७३ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा