शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

चारशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा; अभियांत्रिकीतील आश्चर्य ‘नहर-ए-अंबरी’ला पाहावे लागेल चित्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:14 IST

महापालिका आणि पुरातत्त्व विभागाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष 

ठळक मुद्देया नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. कुठे नहरी, तर कुठे तिचे मेन होल फोडून पाणी घेतले जाते.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : प्रगत अभियांत्रिकीलाही लाजवील अशा खडकी व आताच्या औरंगाबादेतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ‘नहर- ए-अंबरी’ ही सुविधा महापालिका आणि पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ‘खडकी’ या नावाने या शहराची ओळख होती. मलिक अंबरने या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी ‘सायफन’ या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करीत अतिशय कल्पकतेने हर्सूल-सावंगीच्या टेकड्यांपासून रोजाबागपर्यंत भूमिगत कालवा अर्थात मुख्य १२ नहरींद्वारे पाणी आणले. तेथून पुढे खापराच्या पाईपलाईनद्वारे शहराला पाणी वितरण केले. नहरींतील पाणी खळाळून वाहण्यासाठी जमिनीवर उंच मनोरे (मेन होल) उभारण्यात आले होते. 

आज मात्र, ठिकठिकाणी नहरींची तोडफोड व अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे मूळ नहरी हरवून जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहास जपला व तो जोपासला पाहिजे. पण, औरंगाबादकरांना त्याचा विसर पडलेला दिसतो. या नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. कुठे नहरी, तर कुठे तिचे मेन होल फोडून पाणी घेतले जाते. रोजाबाग, हर्सूल, बीबी का मकबरा आदी परिसरात अनेकांनी नहरींवरच घरे उभारली आहेत. सावंगीच्या टेकडीपासून साडेपाच किमीपर्यंत लांब अशा या मुख्य बारा नहरी रोजाबागपर्यंत, तर तेथून पाणचक्कीपर्यंत ७ किमी नहरीचा प्रवास आहे.

कोणतीही ऊर्जा न वापरता केवळ गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे या नहरीचे शाश्वत, शुद्ध पाणी दोन ते अडीच लाख औरंगाबादकरांची तहान भागवत होते. सध्या औरंगाबादकरांना जायकवाडी धरणापासून पंपिंग करून पाणी आणले जाते. विजेच्या बिलापोटी मनपाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. मनपाने नहरींचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन केल्यास नहरीच्या शाश्वत व शुद्ध पाण्याच्या माध्यमातून जुन्या शहरातील नागरिकांची तहान भागवता येऊ शकते. 

संशोधन व प्रेरणेचा विषय आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मोठमोठी धरणे किंवा पाणीपुरवठा योजनेसाठी सायफन पद्धतीचा वापर केला जातो. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी ‘नहर- ए-अंबरी’ हा संशोधन व प्रेरणेचा विषय आहे. या नहरी जपल्या पाहिजेत. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून तरी मनपा व पुरातत्त्व विभागाने याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. - प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय

२५ % नागरिकांसाठी मुबलक पाणीनहरींवरील अतिक्रमणे काढून ठिकठिकाणी भूमिगत जलकुंभ उभारून त्यात पाण्याची साठवण करावी. नहरींचे तुंबलेले झरे मोकळे करावेत. नहरींच्या पाण्याचा वापर झाल्यास शहरातील २५ टक्के नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते. - सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी