शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

चारशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा; अभियांत्रिकीतील आश्चर्य ‘नहर-ए-अंबरी’ला पाहावे लागेल चित्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:14 IST

महापालिका आणि पुरातत्त्व विभागाचे देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष 

ठळक मुद्देया नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. कुठे नहरी, तर कुठे तिचे मेन होल फोडून पाणी घेतले जाते.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : प्रगत अभियांत्रिकीलाही लाजवील अशा खडकी व आताच्या औरंगाबादेतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ‘नहर- ए-अंबरी’ ही सुविधा महापालिका आणि पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ‘खडकी’ या नावाने या शहराची ओळख होती. मलिक अंबरने या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी ‘सायफन’ या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करीत अतिशय कल्पकतेने हर्सूल-सावंगीच्या टेकड्यांपासून रोजाबागपर्यंत भूमिगत कालवा अर्थात मुख्य १२ नहरींद्वारे पाणी आणले. तेथून पुढे खापराच्या पाईपलाईनद्वारे शहराला पाणी वितरण केले. नहरींतील पाणी खळाळून वाहण्यासाठी जमिनीवर उंच मनोरे (मेन होल) उभारण्यात आले होते. 

आज मात्र, ठिकठिकाणी नहरींची तोडफोड व अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे मूळ नहरी हरवून जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहास जपला व तो जोपासला पाहिजे. पण, औरंगाबादकरांना त्याचा विसर पडलेला दिसतो. या नहरींवर अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. कुठे नहरी, तर कुठे तिचे मेन होल फोडून पाणी घेतले जाते. रोजाबाग, हर्सूल, बीबी का मकबरा आदी परिसरात अनेकांनी नहरींवरच घरे उभारली आहेत. सावंगीच्या टेकडीपासून साडेपाच किमीपर्यंत लांब अशा या मुख्य बारा नहरी रोजाबागपर्यंत, तर तेथून पाणचक्कीपर्यंत ७ किमी नहरीचा प्रवास आहे.

कोणतीही ऊर्जा न वापरता केवळ गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे या नहरीचे शाश्वत, शुद्ध पाणी दोन ते अडीच लाख औरंगाबादकरांची तहान भागवत होते. सध्या औरंगाबादकरांना जायकवाडी धरणापासून पंपिंग करून पाणी आणले जाते. विजेच्या बिलापोटी मनपाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. मनपाने नहरींचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन केल्यास नहरीच्या शाश्वत व शुद्ध पाण्याच्या माध्यमातून जुन्या शहरातील नागरिकांची तहान भागवता येऊ शकते. 

संशोधन व प्रेरणेचा विषय आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मोठमोठी धरणे किंवा पाणीपुरवठा योजनेसाठी सायफन पद्धतीचा वापर केला जातो. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी ‘नहर- ए-अंबरी’ हा संशोधन व प्रेरणेचा विषय आहे. या नहरी जपल्या पाहिजेत. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून तरी मनपा व पुरातत्त्व विभागाने याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. - प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय

२५ % नागरिकांसाठी मुबलक पाणीनहरींवरील अतिक्रमणे काढून ठिकठिकाणी भूमिगत जलकुंभ उभारून त्यात पाण्याची साठवण करावी. नहरींचे तुंबलेले झरे मोकळे करावेत. नहरींच्या पाण्याचा वापर झाल्यास शहरातील २५ टक्के नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते. - सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशन.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी