शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या शिदोरीवर ‘केबीसी’चा डल्ला !

By admin | Updated: July 17, 2014 00:26 IST

मोहन बोराडे, सेलू सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे.

मोहन बोराडे, सेलू
शासकीय सेवेत जमविलेली सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे. केबीसीचा घोटाळा उघड झाल्यानंतर तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले असून, या घोटाळ्यासंदर्भात जागोजागी चर्चा सुरू आहे. तालुक्यातील गुंतवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांचा घरात असल्याचे समजते.
सेलू तालुक्यात दोन वर्षांपासून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे पसरविले. हजारो नागरिकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली. सुरुवातीच्या काळात गुंतविलेल्या रक्कमेचे सांगितल्याप्रमाणे हप्ते गुंतवणुकदारांना मिळाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करीत या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी या कंपनीत पैसे गुंतविले. सहा महिन्यापांसून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळत नव्हता. परंतु आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर कोणीही तक्रार नोंदविली नाही. परंतु कंपनीचे प्रमुख पसार झाल्याच्या बातम्या आल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
सेलू व परिसरात अल्पावधीत दामदुप्पट रक्कमेचे अमिष दाखवून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे वाढविले. त्यामुळे सेलू येथे अनेक मेळावेही या कंपनीने घेतले. काही एजंटांना विदेशवारीही घडविली. त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण या कंपनीच्या जाळ्यात अडकले. मित्र कंपनी, नातेवाईकांनाही त्यांनी या कंपनीत गुंतवणुकीसाठी आग्रह धरला. त्यामुळे जवळचा माणूस पाहून अनेकांनी मोठ्या रकमा कंपनीत गुंतविल्या. परंतु काही दिवसांपासून कंपनीकडून पैसे वेळेवर येत नसल्यामुळे गुंतवणुकदार हवालदिल झाले व एजंटांना पैशांची मागणी करू लागले आहेत. विशेष करून नोकरदार महिला व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर या कंपनीत गुंतवणूक आहे. महिलांनीही या कंपनीत मोठ्या आशेने गुंतवणूक केली आहे. दरम्यान रक्क्म परत मिळेल की नाही? या विवंचनेत गुंतवणूकदार आहेत.
सेलूत अनेक कंपन्यांचे पेव
केबीसीसह अल्पावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या कंपन्यांचे सेलू व परिसरात मागील काही वर्षापासून पेव फुटले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नोकरदार मंडळींना आपल्या जाळ्यात अडकवून करोडो रुपये अनेक कंपन्यांनी गिळंकृत केले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील काही बोलक्या मंडळींना हाताशी धरून दामदुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने शेकडो नागरिकांनी या कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले. सामान्य एजंटही चारचाकी गाड्यात फिरू लागले. अनेकांची देहबोली बदलली, राहणीमानही बदलू लागले. हे पाहून अनेक जण या कंपनीच्या मोहात अडकले. परिणामी लवकरच या कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याने अनेकांना गाव सोडण्याची वेळ आली आहे. दरम्यान सेलू व परिसरात अशा कंपन्यांमध्ये शेकडो नागरिकांनी कोट्यवधी रुपये गुंतवविलेले आहेत.