शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

सहस्र दीपांनी उजळले जटवाडा!

By admin | Updated: December 19, 2014 01:00 IST

उदयकुमार जैन, औरंगाबाद श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

उदयकुमार जैन, औरंगाबादश्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. पार्श्वनाथ भगवंतांच्या २७९१ व्या जन्मकल्याणक दिवसाचे औचित्य साधून भाविकांच्या हस्ते २७९१ दीपांनी भगवंतांची महाआरती करण्यात आली. हा दीपोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळा या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.यंदाची यात्रा लक्षवेधी ठरली ती महाआरतीमुळे. भक्तिभावाचे मंगलमय सूर आणि गुलाबी थंडीत देशभरातील हजारो भाविकांची मांदियाळी दिवसभर येथे दिसली. सकाळी नेमीचंद, विपीन, भारती, नितीन, अश्विनी कासलीवाल परिवाराच्या हस्ते कल्याण मंदिर विधान पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यानंतर प्रेमचंद, सुरेशचंद, मयूरकुमार, मधुरकुमार अजमेरा परिवाराच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. बोलियाच्या कार्यक्रमानंतर कुबेर चौगुले (उदगाव) यांच्या साग्रसंगीतात भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी ससंघ उपस्थित असलेले संकटमोचन रोगनिवारक मुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज, संस्कारसागरजी महाराज, गणिनी आर्यिकारत्न श्री १०५ क्षमाश्री माताजी यांच्या मंत्रोच्चाराने भाविकांचा उत्साह वाढत होता. इंद्र-इंद्रायणीचा मान भरतकुमार शांतीलाल डोंगरे परिवाराला, अर्चनाफलचा मान प्रमोदकुमार हंसराज पांडे परिवाराला, तर शांतीधाराचा मान धरमचंद चांदमल पाटणी परिवाराला मिळाला. महाप्रसाददाता फुलचंद, प्रमोदकुमार, कुणाल, भवित, सुषमा, रेखा, कुशानी दगडा परिवारासह सर्व दात्यांचा अतिशय क्षेत्रातर्फे सत्कार करण्यात आला. संचालन महामंत्री देवेंद्र काला यांनी केले. यशस्वीतेसाठी क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांसह ललित पाटणी, एम.आर. बडजाते, प्रमोदकुमार कासलीवाल, महावीर साहुजी, केशरीनाथ जैन, संजय पाटणी, अशोक गंगवाल, कमल कासलीवाल, रमणलाल गंगवाल, मनोज चांदीवाल, सूर्यकांत साहुजी, अशोक अजमेरा, प्रकाश कासलीवाल, प्रमोद पांडे, भरत ठोळे, सुरेश कासलीवाल आदींसह कर्मचारी, समाजबांधव, महिलांनी परिश्रम घेतले. गर्दीमुळे जटवाड्याला पंढरीचे स्वरूप आले होते. यात्रेकरूंसाठी क्षेत्रातर्फे सुसज्ज नियोजन करण्यात आले होते.संतांची अमृतवाणीमुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज व क्षमाश्री माताजी यांचे प्रवचन झाले. महाराजांनी जटवाडा, कचनेर, पैठण, वेरूळ येथील अतिशय क्षेत्रांची महती विशद केली. अतिशय क्षेत्रावर येऊन दर्शन घेतल्याने संकटे आपोआप दूर होतात, असे त्यांनी सांगितले.खराब रस्त्यामुळे त्रासजटवाडा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, आज यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.