शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:22 IST

आवक वाढल्याने गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश

पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी धरणाची पाणी पातळी ६५.६१ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. धरणात ७७ हजार ५७९ क्युसेकने पाण्याची आवक होत असून मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील वर्षी धरण केवळ ५५ टक्के भरले होते. मात्र, यावर्षी ऑगस्ट महिन्यातच या धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आणखी एक महिना पावसाळा आहे. यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूरमधून ५२० क्युसेक, भावली ४८१, भाम २ हजार ९९०, वालदेवी १८३, वाकी ८५३, कडवा ३ हजार २९२, आळंदी २४३, नांदूर मधमेश्वर ३९ हजार १६९, भोजापूर ९१०, होळकर ब्रीज २ हजार २१, पालखेड ३ हजार ९०८, वाघाड २ हजार २७५, तिसगाव ३२२, पुणेगाव १ हजार ३०० आणि ओझरखेड धरणातून १ हजार ३२० क्युसेक पाणी हे नागमठाण धरणात येत आहे. तेथून त्याचा गोदावरी पात्रात विसर्ग केला जात आहे.

नगर जिल्ह्यातील धरणातून असे येते पाणीनगर विभागातील भंडारदरा ६ हजार ९५०, निळवंडे ८ हजार ७४४, मुळा १० हजार, ओझर वेअर ९ हजार ७६९, आडाळा ७८ आणि मजमेश्वर केटीवेअरमधून ३ हजार ६०० क्युसेक पाणी देवगड बंधारा येथे आल्यानंतर ते गोदावरी नदीत सोडले जात आहे. तेथून हे पाणी जायकवाडी धरणात येते.

यापूर्वी असे भरले होते धरण१९७५ पासून धरण शंभर टक्के बारा वेळेस, ५० टक्क्यांच्या पुढे १६ वेळेस आणि २००५ ते २००८ हे तीन वर्षे शंभर टक्के धरण भरले होते. त्यानंतर २०१८ ते २०२२ हे सलग तीन वर्षे धरण शंभर टक्के भरले होते.

वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेशगोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद