शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी ९० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:17 IST

जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.

ठळक मुद्दे४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता

पैठण (जि. औरंगाबाद) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यास पावसाने झोडपले. यात करंजवन ४८ मि.मी., गंगापूर ११४ मि. मी., दारणा २४ मि. मी., भंडारदरा ९५ मि.मी., पालखेड ३८ मि.मी., निळवंडे ८३ मि. मी., नाशिक १८ मि.मी., कन्नड १८ मि. मी., कोतूळ ४५ मि.मी., राहुरी २६ मि. मी., राहाता २८ मि.मी., शिर्डी २८ मि. मी., पिंपळगाव बसवंत ५६ मि.मी., इगतपुरी ८३ मि.मी., घोटी ७३ मि.मी., त्र्यंबकेश्वर ६०  मि.मी, विंचूर २८ मि.मी, आढळा ४५ मि.मी, कश्यपी ७२ मि.मी, गौतमी ६३ मि.मी, कडवा २८ मि.मी, भावली ६८ मि.मी, व वाकी ६५  मि.मी अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सुध्दा पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी पाऊस सुरू होता. यामुळे काठोकाठ भरलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांपैकी दारणा ४३१६, गंगापूर २७४२, पालखेड १७३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत असून हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात १८९३० क्युसेक क्षमतेने सोडण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून २२७७५, भंडारदरा धरणातून ५६७३ क्युसेक असा विसर्ग सुरू असून हे सर्व पाणी ओझर वेअर बंधाºयात जमा होते. ओझर वेअर बंधाºयातून प्रवरेच्या पात्रात १३००० क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी व प्रवरा नदीपात्रातून ३१९३० क्युसेक पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे.  बुधवारी धरणात ६२०६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणात फक्त दोन फूट जागा१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५२० फूट झाली आहे. धरणात आता फक्त दोन फूट जागा शिल्लक राहिली आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक, पूर नियंत्रणासाठी राखीव ठेवावे लागणारे पॉकेट, नियंत्रित विसर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून आवक लक्षात घेता येत्या ४८ तासांत जायकवाडी धरणातून विसर्ग करणे अनिवार्य आहे. पाणी सोडण्याबाबत  बुधवारी दिवसभर जायकवाडी प्रशासनाच्या प्राथमिक हालचाली सुरू होत्या.व्यापारी सतर्क२००६ ला जायकवाडी धरणातून २५०००० क्युसेक क्षमतेने जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला होता.  ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २००६ या दरम्यान पैठण शहर जलमय झाले होते. याचा सर्वाधिक फटका शहरातील व्यापाºयांना सोसावा लागला होता. त्यातच अनेक विमा कंपन्यांनी हात वर केल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पाणी सोडणार असल्याने व्यापाºयांना भितीने ग्रासले असून व्यापारी जायकवाडी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.