शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांपेक्षा ‘ज्ञानमंदिर’ खुले करणे महत्त्वाचे; २३ ऑगस्टपासून शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 13:30 IST

Warning to start school and coaching classes from 23rd August : सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम पाळून २३ ऑगस्टपासून सुरू करू, मग २० विद्यार्थी आले तरी शाळा सुरू करणार

ठळक मुद्देगणित, विज्ञान, इंग्रजी या विषयातील बारकावे ऑनलाइन समजू शकत नाहीत. शिक्षक संघटनेत सामान्य विद्यार्थ्याचा पालक असता तर कळले असते काय नुकसान होत

औरंगाबाद : राज्यात मंदिर खुले करण्यापेक्षा ‘ज्ञानमंदिर’ म्हणजे शाळा खुले करण्याची गरज आहे. घरात देव असतातच, तेथेही पूजापाठ करता येतात. याचा अर्थ भाजपच्या मंदिर खुले करण्याच्या आंदोलनाला माझा विरोध आहे असे नाही, असे स्पष्टीकरण देत शासनाने तातडीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा २३ ऑगस्टपासून शाळा, कोचिंग क्लास सुरू करण्याचा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade ) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. ( It is more important to open a ‘temple of knowledge’ than a temple) 

जिल्ह्यात सर्व अनलॉक असताना ज्ञानमंदिरे सुरू करण्यासाठी शासनाने ‘एसओपी’ (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करावी. त्यानुसार परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही स्वत: नियमावली तयार करून औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम पाळून २३ ऑगस्टपासून सुरू करू, मग २० विद्यार्थी आले तरी शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. बागडे म्हणाले, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी विचलित होत असून, ते शिक्षणापासून दूर जाण्याची भीती वाटते आहे. लेखीपरीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांच्यात नैराश्य येऊ शकते. पिढी बरबाद होऊ नये, यासाठी शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सचे नाव पुढे करून तो निर्णय थांबविला.

बाजारपेठा, मॉल, हॉटेल्स, परमिटरूम्स बिनधास्त मोकळे केले आहेत. तेथे अनोळखी लोकं येतात. त्यांना कोरोना संसर्ग असला तरी ट्रेस करणे अवघड आहे. परंतु शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ओळखीतले, शेजारचे, गल्लीतीलच असतात. विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र यायचे नाही आणि गल्लीत एकत्र खेळायचे हे काही सयुक्तिक वाटत नाही. शाळांनी पल्स मीटर, टेम्परेचर गन, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स पाळल्यास सर्व काही सुरळीत चालेल. गरीब, झोपडपट्टी, ग्रामीण भागातील निरक्षर पालकांच्या पाल्यांचे नुकसान होत आहे. यावेळी भाजप संस्थाचालक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजीव वाघ, प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर, डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, ज्ञानेश्वर दळवी, योगेश्वर रोजेकर आदी उपस्थित होते.

किमान तीन तास तरी शाळा भरवागणित, विज्ञान, इंग्रजी या विषयातील बारकावे ऑनलाइन समजू शकत नाहीत. त्यासाठी वर्ग भरणे गरजेचे आहे. या तीन विषयांसाठी तीन तास शाळा सुरू टप्प्याटप्प्याने सुरू करावी. ग्रामीण भागात जिल्हा परिषद, खासगी शाळा बंद आहेत. शहरात ऑनलाइन शाळा काही प्रमाणात सुरू आहेत. ग्रामीण विद्यार्थी व पालकांचे भागात प्रचंड हाल होत आहेत. शाळा व कोचिंग क्लास सुरू करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

..त्यांचे वेतन सुरू आहेशिक्षक संघटनांनी शाळा सुरू करण्यास विरोध केल्याच्या प्रश्नावर आ. बागडे म्हणाले, शाळा बंद काय आणि सुरू काय, शिक्षकांचे वेतन तर सुरू आहे. शिवाय शिक्षक संघटनेत सामान्य विद्यार्थ्याचा पालक असता तर कळले असते काय नुकसान होत आहे. निरक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांच्या भविष्याचा विचार कुणी करणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाSchoolशाळा