शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांच्या फटक्याने सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:45 IST

जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९१ पदांपैकी तब्बल १४१३ पदे रिक्त आहेत. कार्यरत ९५ टक्के कर्मचारी २0२१ पर्यंत सेवानिवृत्त होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर पदे रिक्त आहेत. एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९१ पदांपैकी तब्बल १४१३ पदे रिक्त आहेत. परिणामी, सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडत आहे. 

औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे आहेत. जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. तुलनेत पदांची भरतीच होत नाही. परिणामी, एकेका अधिकाऱ्याकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणात हीच परिस्थिती आहे. रिक्त पदांमुळे कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सहन करावा लागत आहे. कार्यरत ९५ टक्के कर्मचारी २0२१ पर्यंत सेवानिवृत्त होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

फक्त १२४ कालवा निरीक्षक कार्यरतरिक्त पदांपैकी बहुतांश पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १२४ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार संवर्गातील केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. 

कालवा निरीक्षणावर परिणामकर्मचाऱ्यांची वर्गवारी ठरलेली आहे; परंतु पदे भरली जात नाहीत. लाभक्षेत्रातील व्यवस्थापनांवर परिणाम होत आहे. प्रत्येक सेक्शनच्या अधिकाऱ्याला अधिक काम करावे लागत आहे. जास्त क्षेत्रावर काम करावे लागत असल्याने कालवा निरीक्षणाचे काम होत नाही. कार्यालयातील दस्तावेज तयार होत नाही.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

पाणी जाते वायादप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार यांच्यावर सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी असते; परंतु २५ ते ३० टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत. मनुष्यबळाअभावी सिंचन व्यवस्थापनच करता येत नाही. त्यामुळे शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यास अडचण येते. सिंचन व्यवस्थापनाचे काम कोलमडत आहे. पाऊस पडूनही कर्मचाऱ्यांअभावी गेट उघडे राहिल्याने पाणी वाया जाण्याचा प्रकार होत आहे.- गणेश सोनवणे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना

कामे प्रलंबितआरेखक संवर्गातील मंजूर पदांपैकी ६० टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामे प्रलंबित राहतात. दस्तावेजांची देखभाल करता येत नाही. ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.-जकी अहेमद जाफरी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना  

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकारWaterपाणीEmployeeकर्मचारी