शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

रिक्त पदांच्या फटक्याने सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:45 IST

जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९१ पदांपैकी तब्बल १४१३ पदे रिक्त आहेत. कार्यरत ९५ टक्के कर्मचारी २0२१ पर्यंत सेवानिवृत्त होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांवर पदे रिक्त आहेत. एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९१ पदांपैकी तब्बल १४१३ पदे रिक्त आहेत. परिणामी, सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडत आहे. 

औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे आहेत. जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. तुलनेत पदांची भरतीच होत नाही. परिणामी, एकेका अधिकाऱ्याकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणात हीच परिस्थिती आहे. रिक्त पदांमुळे कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सहन करावा लागत आहे. कार्यरत ९५ टक्के कर्मचारी २0२१ पर्यंत सेवानिवृत्त होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

फक्त १२४ कालवा निरीक्षक कार्यरतरिक्त पदांपैकी बहुतांश पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १२४ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार संवर्गातील केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. 

कालवा निरीक्षणावर परिणामकर्मचाऱ्यांची वर्गवारी ठरलेली आहे; परंतु पदे भरली जात नाहीत. लाभक्षेत्रातील व्यवस्थापनांवर परिणाम होत आहे. प्रत्येक सेक्शनच्या अधिकाऱ्याला अधिक काम करावे लागत आहे. जास्त क्षेत्रावर काम करावे लागत असल्याने कालवा निरीक्षणाचे काम होत नाही. कार्यालयातील दस्तावेज तयार होत नाही.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

पाणी जाते वायादप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार यांच्यावर सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी असते; परंतु २५ ते ३० टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत. मनुष्यबळाअभावी सिंचन व्यवस्थापनच करता येत नाही. त्यामुळे शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यास अडचण येते. सिंचन व्यवस्थापनाचे काम कोलमडत आहे. पाऊस पडूनही कर्मचाऱ्यांअभावी गेट उघडे राहिल्याने पाणी वाया जाण्याचा प्रकार होत आहे.- गणेश सोनवणे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना

कामे प्रलंबितआरेखक संवर्गातील मंजूर पदांपैकी ६० टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामे प्रलंबित राहतात. दस्तावेजांची देखभाल करता येत नाही. ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.-जकी अहेमद जाफरी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना  

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकारWaterपाणीEmployeeकर्मचारी