शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कनकवाडीवासियांशी संवाद

By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST

गोकुळ भवरे, किनवट किनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला.

गोकुळ भवरे, किनवटकिनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत त्यांना सर्व समस्या सोडवू तसेच प्रशासन आपल्याबरोबर असल्याचा विश्वास दिला. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास ग्रामसभा संपली.विभागीय आयुक्त जैस्वाल म्हणाले, ग्रामस्थांंचे सहकार्य असल्याने येथे अनेक शासकीय योजना आल्या आहेत. जनतेच्या सहकार्याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही. शासकीय योजना राबविताना ग्रामस्थांचे सहकार्य असल्याची बाब चांगली असल्याचे प्रशंसनीय उद्गार त्यांनी काढले.या ग्रामसभेत आयुक्तांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले तसेच तत्काळ मजुरी दिली. हा उपक्रम पहिल्यांदाच किनवट दौऱ्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. आयसीआयसीआय बँकेमार्फत मजुरांना मग्रायोजनेची मजुरी वाटप केली जाणार आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल आणि मला मजुरी मिळाली नाही, या तक्रारी होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकवा असे आवाहनही त्यांनी केले. पाऊस लांबल्याने किनवट तालुक्यावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सावट दूर होईल आणि येत्या काळात चांगला पाऊस पडेल याची मला खात्री आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. सरपंच पंडित व्यवहारे व ग्रामसेवक अतुल गावंडे यांनी विभागीय आयुक्त जैस्वाल यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सहशिक्षक सुरेश पाटील यांनी केले. तत्पूर्वी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तहसीलदार शिवाजी राठोड, बीडीओ डॉ. नामदेव केंद्रे, तालुका कृषी अधिकारी संजय कायंदे, माहुरचे बीडीओ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंद्रे, नाईकवाडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाखोरे, सहायक अभियंता देवणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमावार आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. किनवटला प्रमुखांची आढावा बैठककिनवट तालुक्यातील कनकवाडी गावाला भेट देण्यापूर्वी औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी किनवट येथे गुरुवारी सर्व प्रमुखांची आढावा बैठक घेतली. वन हक्क कायदा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रमुखांना दिल्या. यावेळी गोवर्धन मुंडे, रमेश खुपते, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, केंद्रप्रमुख मडावी, पोलिस पाटील विलास सोळंके, उपसरपंच जयवंतराव जाधव, आत्माराम भिसे, गावकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.