शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांनी पाहणी होतेय, मदत लवकर मिळेल तेवढे पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 15:12 IST

पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देकेंद्राच्या पथकाने बांधावर जाऊन घेतला आढावाअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कापणी करता न आल्याने पिकांचे नुकसान झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यात सरत्या वर्षातील अतिवृष्टीमुळे ३६ लाख शेतकऱ्यांनी २६ लाख हेक्टरवर पेरलेले पीक वाया गेले. त्याला दोन महिने झाल्यानंतर केंद्रीय पथकाने औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील पाहणी करून नुकसानीचा विभागातील अंदाज बांधण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून पाहणी दौरा केला.  दोन महिन्यांनी पाहणी होतेय, आता मदत लवकर मिळेल तेवढे पहा, असा संताप औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्यापूर्वी रविवारी नुकसानीचे पंचनामे, छायाचित्रे, व्हिडिओ शूटींग पथकातील अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यावरून नुकसान किती झाले, याचा अंदाज पथकाला आला.

तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगांव, शेकटा व गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथकप्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी निपाणीतील शेतकरी नंदू भालेकर, पांढरी पिंपळगाव येथील शेतकरी विठ्ठल बहुरे, विपीन कासलीवाल, संदीप दुधाळ, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लालू भालेकर यांच्याशी संवाद साधला. पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची उपस्थिती होती.

वीजपुरवठ्याबाबत तक्रारी मांडल्या

वीजपुरवठा रात्री ११ वाजता होतो. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करून पाणीपुरवठा करावा लागतो. सकाळी ७ वाजेपर्यंत वीज असते. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करावे लागते. या सगळ्या दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याच्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

नुकसानीची वस्तुस्थिती मांडलीजिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, पथकासमोर पंचनामे, व्हिडिओ शूटींगच्या माध्यमातून नुकसानीची वस्तुस्थिती मांडली. पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कापणी करता न आल्याने पिकांचे नुकसान झाले. केंद्राकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र