शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात ध्रुवीकरण वाढतेय; बंधुभावाशिवाय या देशाची प्रगती अशक्य : दुष्यंत दवे

By स. सो. खंडाळकर | Updated: April 22, 2023 19:58 IST

संविधानाला कुराण, गीता, गुरुग्रंथसाहिबासारखा दर्जा मिळायला हवा

छत्रपती संभाजीनगर : आज देशात संविधान नष्ट होत चालले आहे. बेरोजगारी एवढी वाढत असताना कुणी आवाज उठवायला तयार नाही. जाती- जातीचे व धर्मा- धर्माचे ध्रुवीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे बंधुभावही नष्ट होत चालला आहे आणि बंधुभावाशिवाय या देशाची प्रगती अशक्य आहे, असे रोखठोक प्रतिपादन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी केले. याचवेळी ते म्हणाले की, संविधानाची भक्ती झाली पाहिजे आणि कुराण, गीता व गुरुग्रंथसाहिबासारखा दर्जा संविधानाला प्राप्त झाला पाहिजे.

कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे स्वातंत्र्यसेनानी कॉ. चंद्रगुप्त चौधरी व कॉ. करुणाभाभी चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘भारतीय संविधानिक नैतिकता, न्याय संस्था आणि लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर ते मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी.एच. मर्लापल्ले होते.

प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते चौधरी दाम्पत्याच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी, कॉ. समाधान इंगळे, कॉ. अमरजित बाहेती, नभा इंगळे, उमेश इंगळे यांनी क्रांतिगीते गायली. स्मृती समितीचे कॉ. भालचंद्र कानगो यांनी प्रास्ताविक केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉ. देवीदास तुळजापूरकर यांनी आभार मानले.

दुष्यंत दवे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे अनेक दाखले दिले व त्यांच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली. जणू १९७५ नंतर या देशात काय होणार याची जाणीव डॉ. बाबासाहेबांना त्यावेळी आली होती. देशात जी काही परिस्थिती उद्भवत आहे, त्याला नागरिक म्हणून आपणही जवाबदार असल्याचे दवे म्हणाले. संविधान म्हणजे देशासाठी कोड ऑफ कंडक्ट आहे. हा देश मुळातच अलोकशाहीवादी असल्याचे बाबासाहेब म्हणाले होते. ३६ टक्के मतदान घेतलेला पक्ष आमच्यासोबत सारा देश उभा असल्याचे सांगतात, हे हास्यास्पद आहे. औरंगजेबाच्या काळातही हिंदुत्व इतके धोक्यात नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. प्रबळ विरोधी पक्षांशिवाय लोकशाही मजबूत होणार नाही. उपमुख्यमंत्रिपद हा घटनेचा विपर्यास आहे. तुम्ही आमच्याबरोबर आरोपमुक्त व्हा, असे राजकारण सध्या चालू आहे. निवडून आलेल्या लोकांना पक्षाशी फारकत घेणे सोपे झालेय, याकडे अध्यक्षीय भाषणात मर्लापल्ले यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक