शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात!

By विजय सरवदे | Updated: June 20, 2023 12:54 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने बांधकाम निधी गोठवला; स्वतःच्या इमारतीचे स्वप्न अंधकारमय

छत्रपती संभाजीनगर : देशातील पहिली ‘आयएसओ’ अंगणवाडी होण्याचा मानही औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला होता. मात्र, शासनाने यंदापासून अंगणवाडी इमारत बांधकामाचा निधीच गोठवला असल्यामुळे या जिल्ह्यातील सुमारे ६०० अंगणवाड्यांचे स्वतःच्या इमारतीत संसार थाटण्याचे स्वप्न अंधकारमय झाले आहे. 

ग्रामीण भागातील बालकांचे लसीकरण, त्यांना पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाचे धडे गिरवता यावेत, तसेच कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर माता यांना पोषण आहार देण्याचे केंद्र म्हणून अंगणवाड्यांकडे बघितले जाते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली साडेतीन हजार अंगणवाड्या कार्यरत होत्या. यापैकी २७०० ते २८०० अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत आहेत, तर उर्वरित अंगणवाड्या समाज मंदिर, ग्रामपंचायतीच्या खोलीत, तर कुठे जि.प. शाळांमध्ये चालतात. त्यांना स्वत:ची इमारत मिळाल्यास बालकांना स्वच्छंदपणे बागडणे, पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाचे धडे गिरवणे, महिला, किशोरी मुलींना स्वच्छतागृहाच्या सुविधा देता येतात. 

त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत टप्प्याटप्प्याने दरवर्षी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जवळपास १० कोटींचा निधी दिला जायचा. आता या वर्षापासून शासनाने हा निधी देणेच बंद केले आहे. त्यामुळे जवळपास ६०० अंगणवाड्यांना आता हक्काचे छत मिळणे दुरापास्त झाले आहे. दुसरीकडे, ७८ अंगणवाड्या फुलंब्री, सोयगाव नगरपंचायत आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत, हे विशेष!

इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी नाही जिल्हा नियोजन समितीने २०२१-२२ मध्ये ७२, २०२२-२३ मध्ये ५० अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी १०-१० कोटींचा निधी दिला. त्यातून ७२ पैकी ६९ इमारतींचे काम प्रगतिपथावर आहे, तर ५० अंगणवाडी इमारत बांधकामाची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे. ११.२५ लाख रुपये खर्चून एक इमारत उभारली जाते. आता जि.प. महिला व बालविकास विभाग तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीत महिला व बालविकास विभाग या दोघांना मिळून जिल्हा नियोजन समितीच्या एकूण बजेटच्या ३ टक्के एवढा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी खर्च करता येणार नाही, असे कार्यालयीन सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद