शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात सुधारली हवेची गुणवत्ता; घातक वायूंच्या प्रमाणात प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:01 IST

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे.

ठळक मुद्देवायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेचा अहवाल लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतरचे टप्पे

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : लॉकडाऊनचा उपयोग कोरोना महामारी रोखण्यासाठी किती झाला, हे माहीत नाही. मात्र, यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची सुधारत गेली आणि प्रत्येकालाच एक आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. लॉकडाऊनदरम्यान शहराच्या हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे, असे वायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट दिसून येते.

लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात घातक वायूंच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली घट याविषयीचा अभ्यास या संस्थेतर्फे करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मुंबई या शहरांप्रमाणे औरंगाबादचा समावेश १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्डस्च्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये होतो. या शहरांमधील प्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे.

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. पीएम २.५ म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण होय. या धूलिकणांची पातळी ४० पेक्षा कमी असणे गरजचे आहे. लॉकडाऊनपूर्वी सल्फर डायआॅक्साईडचे प्रमाण ७.७ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ६.२ झाले आहे. डोळ्यांची जळजळ, नाक, घशाचे आजार व श्वसनाचे विकार प्रामुख्याने सल्फर डायआॅक्साईडमुळे होणाऱ्या प्रदूषणाने होतात. 

लॉकडाऊनपूर्वी नायट्रस डायआॅक्साईडचे प्रमाण १९. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते आता १७.६ पर्यंत कमी झाले आहे. थरथर कापणे, मळमळ, उलट्या, असे दुष्परिणाम या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होतात. पीएम १० चे प्रमाण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात निम्म्यावर आले आहे. ८१.३ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटरवरून ते प्रमाण ४३.२ एवढे झाले आहे. पीएम १० म्हणजे १० मायक्रो मीटर आणि त्यापेक्षा लहान व्यासाचे धूलिकण. हे धूलिकण अतिसूक्ष्म असल्याने ते थेट रक्तात किंवा फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात. अतिविषारी समजल्या जाणाऱ्या कार्बन मोनोक्साईडच्या प्रमाणात ६५०.१ वरून ४९८.९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढी घट झाली आहे, तर ओझोनचे प्रमाण ३६.४ वरून ५०.४ पर्यंत वाढले आहे. 

प्रदुषणमुक्त हवा राहावीपर्यावरण कार्यकर्ती रिधिमा पांडे हिच्या ‘साल भर ६०’ या डिजिटल उपक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. लॉकडाऊनच्या ६० दिवसांमध्ये जशी प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी हवा होती, तशीच हवा वर्षभर राहावी, या मागणीसाठी ही मोहीम सुरू झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या ६० मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर या सुरक्षित पातळीनुसार (२४ तासांसाठी) शहरातील प्रदूषणाचा स्तर नियंत्रित राहावा, यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या जाण्याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमेतून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण