शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात सुधारली हवेची गुणवत्ता; घातक वायूंच्या प्रमाणात प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:01 IST

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे.

ठळक मुद्देवायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेचा अहवाल लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतरचे टप्पे

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : लॉकडाऊनचा उपयोग कोरोना महामारी रोखण्यासाठी किती झाला, हे माहीत नाही. मात्र, यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची सुधारत गेली आणि प्रत्येकालाच एक आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. लॉकडाऊनदरम्यान शहराच्या हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे, असे वायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट दिसून येते.

लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात घातक वायूंच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली घट याविषयीचा अभ्यास या संस्थेतर्फे करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मुंबई या शहरांप्रमाणे औरंगाबादचा समावेश १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्डस्च्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये होतो. या शहरांमधील प्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे.

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. पीएम २.५ म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण होय. या धूलिकणांची पातळी ४० पेक्षा कमी असणे गरजचे आहे. लॉकडाऊनपूर्वी सल्फर डायआॅक्साईडचे प्रमाण ७.७ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ६.२ झाले आहे. डोळ्यांची जळजळ, नाक, घशाचे आजार व श्वसनाचे विकार प्रामुख्याने सल्फर डायआॅक्साईडमुळे होणाऱ्या प्रदूषणाने होतात. 

लॉकडाऊनपूर्वी नायट्रस डायआॅक्साईडचे प्रमाण १९. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते आता १७.६ पर्यंत कमी झाले आहे. थरथर कापणे, मळमळ, उलट्या, असे दुष्परिणाम या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होतात. पीएम १० चे प्रमाण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात निम्म्यावर आले आहे. ८१.३ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटरवरून ते प्रमाण ४३.२ एवढे झाले आहे. पीएम १० म्हणजे १० मायक्रो मीटर आणि त्यापेक्षा लहान व्यासाचे धूलिकण. हे धूलिकण अतिसूक्ष्म असल्याने ते थेट रक्तात किंवा फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात. अतिविषारी समजल्या जाणाऱ्या कार्बन मोनोक्साईडच्या प्रमाणात ६५०.१ वरून ४९८.९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढी घट झाली आहे, तर ओझोनचे प्रमाण ३६.४ वरून ५०.४ पर्यंत वाढले आहे. 

प्रदुषणमुक्त हवा राहावीपर्यावरण कार्यकर्ती रिधिमा पांडे हिच्या ‘साल भर ६०’ या डिजिटल उपक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. लॉकडाऊनच्या ६० दिवसांमध्ये जशी प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी हवा होती, तशीच हवा वर्षभर राहावी, या मागणीसाठी ही मोहीम सुरू झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या ६० मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर या सुरक्षित पातळीनुसार (२४ तासांसाठी) शहरातील प्रदूषणाचा स्तर नियंत्रित राहावा, यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या जाण्याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमेतून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण