शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून जनावरांची खरेदी-विक्रीला बंदी

By विजय सरवदे | Updated: May 10, 2024 13:28 IST

टॅग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक हवाच

छत्रपती संभाजीनगर : टॅगिंग नसणाऱ्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग झाले आहे का, झाले असेल, तर मालकांच्या आधार कार्डसोबत टॅगिंग क्रमांक लिंक आहे का, मयत झालेली, विक्रीनंतर बाहेरगावी गेलेली जनावरे याची पडताळणी करण्यासाठी जि. प. पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.

जिल्ह्यात सन २०१९ नंतर पशुगणना झालेली नाही. तेव्हाच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५ लाख ३८ हजार ५७२ गायवर्ग, ९४ हजार ४३० म्हैसवर्ग, ४ लाख ३१ हजार १८२ शेळ्या, ८८ हजार २४४ मेंढ्या आणि वराह १० हजार ६४६ असे एकूण ११ लाख ६३ हजार ३४ जनावरे असून, सद्य:स्थितीत ८ लाख ९४ हजार जनावरांचे टॅगिंग झाल्याच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर अपडेट करण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुधनास इअर टॅगिंग केल्यानंतर ऑनलाईन नोंदी घेण्यात येत आहेत. या नोंदी पशुवैद्यक हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन जनावरांना करून घेणार आहेत. इअर टॅगिंगमुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म- मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

काय आहे इअर टॅगिंगइअर टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लास्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो. त्यात त्या जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी त्या जनावरांवर केलेले उपचार, लसीकरणाबाबत विविध नोंदी ऑनलाईन घेत असतात. या नोंदी भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असतात. यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी तस्करीपासून संरक्षण करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या टॅगिंगचा फायदा होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद