शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून जनावरांची खरेदी-विक्रीला बंदी

By विजय सरवदे | Updated: May 10, 2024 13:28 IST

टॅग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक हवाच

छत्रपती संभाजीनगर : टॅगिंग नसणाऱ्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग झाले आहे का, झाले असेल, तर मालकांच्या आधार कार्डसोबत टॅगिंग क्रमांक लिंक आहे का, मयत झालेली, विक्रीनंतर बाहेरगावी गेलेली जनावरे याची पडताळणी करण्यासाठी जि. प. पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.

जिल्ह्यात सन २०१९ नंतर पशुगणना झालेली नाही. तेव्हाच्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५ लाख ३८ हजार ५७२ गायवर्ग, ९४ हजार ४३० म्हैसवर्ग, ४ लाख ३१ हजार १८२ शेळ्या, ८८ हजार २४४ मेंढ्या आणि वराह १० हजार ६४६ असे एकूण ११ लाख ६३ हजार ३४ जनावरे असून, सद्य:स्थितीत ८ लाख ९४ हजार जनावरांचे टॅगिंग झाल्याच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर अपडेट करण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुधनास इअर टॅगिंग केल्यानंतर ऑनलाईन नोंदी घेण्यात येत आहेत. या नोंदी पशुवैद्यक हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन जनावरांना करून घेणार आहेत. इअर टॅगिंगमुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म- मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

काय आहे इअर टॅगिंगइअर टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लास्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो. त्यात त्या जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी त्या जनावरांवर केलेले उपचार, लसीकरणाबाबत विविध नोंदी ऑनलाईन घेत असतात. या नोंदी भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असतात. यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी तस्करीपासून संरक्षण करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या टॅगिंगचा फायदा होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद