शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

केळी लागवड केल्यास जास्त उत्पादन

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

रामेश्वर काकडे, नांदेड केळीची लागवड जून,आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला.

रामेश्वर काकडे, नांदेडकेळीची लागवड जून, जुलै व आॅक्टोबर या तीन महिन्यांत केल्यास सर्वाधिक उत्पादन मिळते, असा निष्कर्ष नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सतत तीन वर्षे केलेल्या संशोधनाअंती काढला आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत नांदेड येथील केळी संशोधन केंद्राच्या डॉ. एस. व्ही.धुतराज व प्रा.आर.व्ही.देशमुख या शास्त्रज्ञांनी मागील तीन वर्षांपासून केळी लागवडीवर प्रयोग केला आहे. प्रयोगाअंती लागवडीची शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. केळीच्या अर्धापुरी तसेच ग्रॅन्डनैन या वाणाचे जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक लाभ मिळण्यासाठी लागवड जून अथवा जुलै महिन्यामध्ये करण्याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात आली आहे.जून महिन्यामध्ये केळी लागवड केल्यास ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले असून खर्च वजा जाता निव्वळ ७ लाख २०४७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीचे हेक्टरी ७७.७ मेट्रिक टन उत्पादन निघाले. खर्च वजा जाता निव्वळ ६ लाख २६५०० रुपये उत्पन्न मिळाले. तर आॅक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर हेक्टरी ६९.४ मे.टन उत्पादन निघाले असून यातून ५ लाख ९२७५० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. यासाठी शेतकऱ्यांनी विशेषता जून, जुलै व आॅक्टोबर या महिन्यात लागवड करावी, जेणेकरुन उत्पादन जास्त निघून दरही चांगले मिळाले आहेत.लागवडीपूर्व मशागत जमीन लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करुन दोन-तीन वेळा वखरणी करावी, मोठी ढेकळी असतील तर रोटाव्हेटरच्या सहाय्याने बारीक करुन जमीन भुसभुशीत करावी. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, निचरा कमी आहे त्या शेतीमध्ये आधी धैंचा पेरावा आणि ४५ दिवसानंतर धैंचा जमिनीमध्ये गाडावा त्यानंतर लागवड करावी. त्यानंतर एक हजार रोपासाठी पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरावे. केळीसाठी जमीन चांगली तापलेली व मोकळी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ज्या अंतरावर केळी लागवड करावयाची आहे, त्याच्या दोन महिने अधिच सऱ्या पाडण्याचे काम करणे योग्य ठरते.केळीच्या जातीमराठवाड्यात प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अधापुरी व ग्रॅन्डनैन या जातीची लागवडीसाठी निवड केली जाते. या वाणाचा वापर वाढत आहे. ऊतीसंवर्धन रोपे तयार करण्यासाठी मातृवृक्षाची निवड करावी लागते. त्यासाठी वेगळÞे असे मातृरोपवाटिकेचे क्षेत्र असावे व असे क्षेत्र कीड व रोगमुक्त असावे. सरासरी २५ ते ३० किलो वजनाचा घड असलेल्या झाडाचे मुनवेच वापरलेले असावे. ऊतीसंवर्धित रोपांची लागवडरोपे लागवडीच्या आदल्यादिवशी ठिबक सिंचन संच चालवून जमीन ओली करुन घ्यावी व वाफसा स्थिती निर्माण झाल्यावर लागवड करावी.रोपांची लागवड पावसाळ््यात दिवसभर करता येते, परंतु अन्य हंगामात लागवड करताना दुपारी तीन वाजेनंतरच करावी. सर्वप्रथम रोपांची पिशवी हातामध्ये घेवून त्यातील माती हाताने काढावी, जेणेकरुन रुटबॉल फुटणार नाही. त्यानंतर डाव्या हाताच्या रोप मातीसह अलगद काढून घ्यावे. मातीच्या गोळ््यासह रोप एक बाय एक बाय एक फूट आकाराच्या खड्ड्यामध्ये अथवा सरीमध्ये ठेवावे. सोबत १० ग्रॅम प्रतिझाड फोरेट टाकावे.लागवडीसाठीचे हवामानकेळी हे उष्ण व कटीबंधीय पीक असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणत: केळी पिकास १२ ते ४० अंश तापमान चांगले ठरते.जमिनीची निवडज्या जमिनीमध्ये केळी लावायची आहे त्या जमिनीच्या प्रतीवर उत्पादन अवलंबून आहे. केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीची पोयटायुक्त आणि सेंदिय कर्ब असलेली व ६ ते ७.५ सामू असलेली जमीन योग्य असते.क्षारता ०.०५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. नदीकाठची, क्षारयुक्त, चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करु नये.लागवडीचा हंगाम ऊतीसंवर्धन केळीची लागवड अतिउष्णतेचा कालावधी आणि अतिथंडीचा कालावधी सोडून वर्षभर करता येते. परंतु बाजारभावाचा विचार करुन लागवड करणे फायद्याचे ठरते.