शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हुश्श... १५० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अखेर प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:04 IST

शासन आणि महापालिका निधीतून शहरातील ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. अखेर मंगळवारी मनपा प्रशासनाने १५० कोटींची फेरनिविदा काढली.

ठळक मुद्देनिविदा भरण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना २५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

औरंगाबाद : शासन आणि महापालिका निधीतून शहरातील ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. अखेर मंगळवारी मनपा प्रशासनाने १५० कोटींची फेरनिविदा काढली. प्रशासनाने निविदा काढल्यानंतर राजकीय मंडळींच्या जिवात जीव आला. मागील आठ दिवसांपासून निविदा काढा, असा तगादा प्रशासनाकडे लावण्यात आला होता.

निविदा भरण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना २५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ३ आॅगस्टला या निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर कार्यादेश देण्यात येणार आहेत. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने २७ जून २०१७ रोजी महापालिकेला १०० कोटी रुपये मंजूर केले. या निधीत ५० कोटी मनपाच्या तिजोरीतून टाकून १५० कोटींचे रस्ते करण्याचा निर्णय तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी घेतला. एकूण ५२ रस्ते १५० कोटी रुपयांमध्ये होत आहेत. 

निधी मिळाल्यानंतर काय झाले?राज्य शासनाने निधी मंजूर करताच कोणते रस्ते विकसित करावेत, यावरून वाद सुरू झाला. राजकीय मंडळींनी एकमेकांचे पाय ओढण्यास सुरुवात केली होती. कशीबशी तीन महिन्यांनंतर यादी अंतिम झाली. या यादीत आपल्या वॉर्डातील अंतर्गत रस्ते, डी.पी. रोड यावेत म्हणून नगरसेवकांचा रुसवा-फुगावा सुरू झाला. भाजपचे तत्कालीन महापौर बापूघडमोडे यांनी कशीबशी यादी मंजूर केली.

कंत्राटदारांमध्ये भांडणमनपातील दिग्गज राजकीय मंडळींनी ही कामे कोणाला मिळावीत म्हणून लॉबिंग सुरू केली. शहरातील सर्व कंत्राटदारांना बसवून आपसात कामे वाटूनही घेतली. पुण्याच्या एका कंत्राटदाराने बंडखोरी करीत सर्व कामे आपल्या खिशात घातली. अखेर निविदा प्रक्रियेचा वाद न्यायालयात पोहोचला. दोन महिन्यांपूर्वी न्यायालयात कंत्राटदारांची तडजोड करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात डीएसआरचे दर कमी झाले. शासनाने जुने डीएसआर दर न वापरता नवीन एसएसआर दर वापरावेत, अशी सूचना केली. त्यामुळे नवीन निविदा काढण्यात बराच वेळ गेला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीroad safetyरस्ते सुरक्षाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद