शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

औरंगाबादेतील ३ किलोमीटर लांब गटार बंद करणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:13 AM

शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रश्न : आयुक्तांच्या आदेशानंतरही धोकादायक मॅनहोल उघडेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक नाल्या ३ ते ४ किलोमीटर लांब आहेत. एवढ्या मोठ्या लांब नाल्यांवर सिमेंटचे ढापे, लोखंडी जाळ्या टाकणे अशक्यप्राय बाब आहे. तूर्त दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी लोखंडी बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डात धोकादायक मॅनहोल बंद करण्यासाठी वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर शहरातील धोकादायक नाल्या, ड्रेनेजच्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका अजूनही याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी सर्व अधिकाºयांना शहरातील धोकादायक मॅनहोल बंद करण्याचे आदेश दिले. ज्याठिकाणी दोन निष्पाप नागरिकांचा जीव गेला तेथीलही नाली, मॅनहोल बंद करण्यात आले नाही. शहरातील एकही धोकादायक मॅनहोल बंद करण्यात आल नाही. उलट शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, काही वसाहतींमध्ये तीन ते चार किलोमीटर लांब नाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ढापे, लोखंडी जाळी टाकणे अशक्यप्राय आहे. प्रत्येक वसाहतीत असा प्रयोग केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपये लागतील. जुनाबाजार येथील नाला कायमस्वरुपी महापालिकेने बंद केला. नाला बंद करता येऊ शकतो तर नाली का नाही... यावर सारवासारव करीत घोडेले यांनी नमूद केले की, ही कामे करण्यात येणार आहेत. तूर्त दुर्घटना घडू नये म्हणून बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जयभवानीनगरचे काय करणार?जयभवानीनगर येथे महापालिकेने तब्बल १५० घरांसमोर नाला खोदून ठेवला आहे. या नाल्यात भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. शहरात आणखी मोठा पाऊस झाल्यास या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आजही या १५० घरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेला नाल्यावर स्लॅब टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या गंभीर विषयाकडे प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.अहवाल १५ दिवसांनंतरजयभवानीनगर येथील नाल्यात बुडून भगवान मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तास होण्यापूर्वीच सिडको एन-६ येथे चेतन चोपडे यांचा मृत्यू झाला. या घटनांची सविस्तर चौैकशी करावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत २० जून रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आला. मागील नऊ दिवसांमध्ये मनपाने कोणतीच चौैकशी सुरू केली नाही. गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी यांच्याकडे चौैकशी सोपविली. चौैकशीचा कालावधी १५ दिवस ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस