शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:01 IST

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने जिल्ह्यातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘वेरुळ, अजिंठा लेणी पाहण्यासाठी यायचे आहे, पण सध्या वातावरण कसे आहे ? पर्यटनासाठी यावे की नाही ?’ अशी विचारणा पर्यटकांकडून जिल्ह्यातील टूर व्यावसायिक, गाईड्स यांना होत आहे.

नागपूरच्या तणावानंतर राज्यभरात अर्लट घोषित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्याची पर्यटन राजधानी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ (एलोरा) लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला यासारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या ठिकाणांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. जिल्ह्यातील वातावरण कसे आहे, पुढे परिस्थिती कशी राहील, पर्यटनासाठी यावे की, अन्य स्थळांकडे जावे, अशी विचारणा पर्यटकांकडून टूर व्यावसायिकांना होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या वातावरण निवळले नाही तर पर्यटनाला फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: खुलताबाद, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला येथील स्थानिक रोजगार आणि उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.

...तर परिणाम होईलसध्या पर्यटनस्थळांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, मुंबई, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांकडून शहरातील वातावरणाविषयी विचारणा होत आहे. अधिक दिवस असेच वातावरण राहिले तर पर्यटनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.- भरत जोशी, गाईड, वेरूळ

चिंतादायक स्थितीऔरंगजेबच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वातावरणाने एजंट्सना शहराच्या स्थिरतेबद्दल विचारणा सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणतेही टूर रद्द झालेले नाही. परंतु, चिंता निश्चितच आहे. सुदैवाने आपण हंगामाच्या शेवटी येत आहोत.- जसवंतसिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

‘ग्रोक’ही म्हणाला, पर्यटनाला बसेल फटकाइलाॅन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनी ‘एक्स एआय’चा चॅटबाॅट ‘ग्रोक’ एआय सध्या चर्चेत आहे. या ‘ग्रोक’ला ‘औरंगजेबची कबर काढण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनास फटका बसेल काय ?’ अशी विचारणा केली. तेव्हा ‘होय’ असे उत्तर देत ‘ग्रोक’ने पर्यटनाला अल्पकालीन आणि कदाचित दीर्घकालीन नुकसान सहन करावे लागू शकते, असे सांगितले. त्याबरोबर कोणकोणत्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल, याची मांडणी केली.

टॅग्स :tourismपर्यटनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangzeb Tombऔरंगजेबाची कबर