शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 7:32 PM

बेकायदेशीररीत्या वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय निसर्गप्रेमींनी घेतला

औरंगाबाद : वृक्ष निर्जीव नाहीत, तर सजीव आणि परोपकारी आहेत. बेकायदेशीररीत्या त्यांची कत्तल करून त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही, अशा संतप्त भावनांसह कांचनवाडी येथील वटवृक्षहत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून निसर्गप्रेमींनी मंगळवारी सकाळी वृक्षाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बेकायदेशीररीत्या वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कांचनवाडीत ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७० ते ८० वर्षे जुना एक वटवृक्ष तोडला. वृक्ष तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली नाही. या प्रकाराविषयी निर्सगप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील निसर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या सृष्टीसंवर्धन संस्था, वुई फॉर एन्व्हायर्नमेन्ट, सलीम अली सरोवरसंवर्धन समिती, निसर्ग मित्रमंडळ, प्रयास ग्रुप, जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्थांंसह शेकडो निसर्गप्रेमींनी मंगळवारी सकाळी कांचनवाडीत श्रद्धांजली सभा घेतली. कत्तल झालेल्या वृक्षाला पुष्प अर्पण करून दोन मिनिटे मौन बाळगले.

हेल्पलाईन, लीगल सेलबेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी हेल्पलाईन, लीगल सेल असावा, अशी सूचना सभेत करण्यात आली. संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कायदेशीर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा, भविष्यात अशा प्रकारे वृक्षतोड होऊ नये, म्हणून सक्षम यंत्रणा उभारण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. 

चार झाडे वाचविण्यात यशकांचनवाडीतील एका वृक्षासंदर्भात काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्ज दिला होता. अर्जाचा आधार घेत एका झाडाचे अनेक झाडे करून बेकायदेशीरपणे अनेक झाडे तोडण्यात येणार होती. एक वटवृक्ष तोडल्यानंतर दुसरी झाडे अर्धी तोडण्याच्या आतच हा प्रकार निसगरप्रेमींच्या निदर्शनास आला. आणखी किमान ४ झाडे तोडण्यात येणार होती; परंतु ही झाडे वाचविण्यात यश आले.

निसर्गप्रेमींनी केलेल्या मागण्या१.सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा, इतर कागदपत्रे पर्यावरणप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देऊन मत, आक्षेप, पुरावे मांडण्याची संधी द्यावी.२.शहरातील कोणतेही झाड तोडण्यासाठी महापालिकेस अर्ज प्राप्त झाल्यास महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष जतन कायदा १९७५ कलम ८ (३) नुसार वर्तमानपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना व वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करावी.३.संबंधित झाडावर सा. बां. विभागाने सूचना फलक लावून निर्णयाविषयी पूर्वकल्पना द्यावी. ४.कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण करून परवानगी दिल्यानंतर १५ दिवस वृक्षतोड करू नये.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणhighwayमहामार्ग