शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

भारतात इतिहासाचे विश्लेषक घडले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:19 IST

वेदकाळापासून भाषांतराची परंपरा नसल्यामुळे जगभरातील ज्ञान भारतात पोहोचले नाही. भारतात फक्त पुराण असून, चांगले इतिहास विश्लेषक घडले नाही, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले. केले.

ठळक मुद्देआनंद पाटील : शिवजयंतीनिमित्त आंतरविद्याशाखीय चर्चासत्र उत्साहात

औरंगाबाद : वेदकाळापासून भाषांतराची परंपरा नसल्यामुळे जगभरातील ज्ञान भारतात पोहोचले नाही. भारतात फक्त पुराण असून, चांगले इतिहास विश्लेषक घडले नाही, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले. केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘दी इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाई’ यांच्यातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य- इतिहास, साहित्य आणि सद्यकालीन परिस्थिती’ या विषयावर आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मौलाना आझाद संशोधन केंद्रात शनिवारी केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले. यावेळी ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या पुस्तकाचे लेखक-समीक्षक प्रा. डॉ. आनंद पाटील, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे, प्रा. प्रदीप सोळुंके, प्रा. श्रीराम जाधव, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ.राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. महेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आनंद पाटील यांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बीजभाषण केले. आपल्या देशात इतिहास म्हणून भाकडकथा सांगितल्या जातात. इतर देशातील ज्ञान भाषांतरित होऊन आले नसल्यामुळे आपण कुठे आहोत याचे भान राहिले नाही. इतिहासात नेहमीच अज्ञानाचे उत्पादन केल्यामुळे सांस्कृतिक गळचेपी झाली. महाराष्ट्रात सत्य बोलणे म्हणजे न जगण्याची सोय करणे असे इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटले होते. त्याची प्रचीती आजही येते. सिद्धांत व संकल्पना ठाऊक नसल्यामुळे आजच्या काळाला जोडून भाकडकथा सांगतात. नव्या पिढीने व्यासंग वाढवून तटस्थ व मोलाचे इतिहास लेखन करावे, असे आवाहन डॉ. आनंद पाटील यांनी केले. डॉ. महेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात ११० संशोधकांनी सहभाग घेतला. डॉ.अनिस अब्दुल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हुसेन शेख, प्रा. कृष्णा आगे, प्रा. राजाराम जेवे, डॉ. अशोक हुंबे, डॉ. विष्णू पाटील आदींनी चर्चासत्रासाठी परिश्रम घेतले.इतिहासात रमतो त्याचे भविष्य अंधकारमयजो समाज इतिहासात रमतो त्याचे भविष्य अंधकारमय असते. इतिहासातून धडा घेऊन वर्तमानकाळ जिंकायचा असतो. मोठ्या समाजाला अंकित ठेवण्यासाठी इतिहासाची मोडतोड करतात, असे ग्रामचीने म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अतिरंजित सांगितला गेला. हिंदूविरुद्ध मुस्लिम वादासाठी इतिहास वापरला गेला. त्याला छेद देण्याचे काम वास्तववादी अभ्यासकांनी केले, असे प्रतिपादन श्रीमंत कोकाटे यांनी केले.

टॅग्स :historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज