शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या लाटेत हिंगोली गारठली

By admin | Updated: December 25, 2015 00:01 IST

हिंगोली : मागील काही दिवसांपासून गायब झालेली थंडीची लाट पुन्हा अवतरली आहे.

हिंगोली : मागील काही दिवसांपासून गायब झालेली थंडीची लाट पुन्हा अवतरली आहे. हिंगोली जिल्ह्याचे दिवसाचे तापमान २६ अंश सेल्सिअस असले तरीही हवेत असलेल्या गारव्यामुळे उन्हाची तीव्रता अजिबात जाणवत नाही. रात्रीचे तापमान १२ सेल्सिअसपेक्षाही खाली उतरत आहे. यावर्षी सुरुवातीचे काही दिवस वगळले तर थंडी जाणवतच नव्हती. त्याचा पीक परिस्थितीवरही मोठा परिणाम झाला होता. गहू तर अवेळी निसवल्याने मोठे नुकसान झाले. गव्हाची चांगल्याप्रकारे वाढही झालेली नसल्याने फुटभर गव्हाला तोरंब्याही कमी आकाराच्याच आहेत. तसेच मेथी, पेरू यांचेही नुकसान झाले. थंडी नसल्याने तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला. अळीच्या हल्ल्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले. बुधवारी रात्री थंडीची लाट आल्यासारखी थंडी जाणवत होती. गुरूवारी तर दिवसाही थंडी जाणवत असल्याने अनेकांनी दिवसभर उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसून येत होते. साधारण ढगाळ वातावरणात उन्हाची तीव्रताही जाणवत नव्हती. त्याचबरोबर सकाळच्या वेळी धुके पडल्याचे जाणवत होते. थंडीच्या कडाक्यामुळे आज शेकोट्याही मोठ्या प्रमाणात पेटल्याचे दिसून येत होते. हिंगोली शहरातील विविध भागात रस्त्यावर उबदार कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र त्या ठिकाणी ग्राहक फिरकतही नव्हते. गुरूवारी दुपारी मात्र अशा दुकांनावर गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळत होते. कोणतीही तयारी न करता आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना या दुकानांमुळे स्वेटर, मफलर, शॉल खरेदीची आठवण झाली. रुग्णसंख्या वाढली : पिकांना फायदा अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने रुग्णसंख्याही वाढत आहे. अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांत या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. लहान मुले व वृद्धांना थंडीचा कडाका सहन होत नसल्याने त्यांच्यात आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. या थंडीमुळे पिकांना काही प्रमाणात फायदा होणार आहे. कडक उन्हामुळे काही ठिकाणी हरभऱ्याला फटका बसत असल्याचे दिसून येत होते. त्याला फायदा होईल. वऱ्हाडी गारठले एकतर शासकीय सुट्या व मोठ्या लग्नतिथी लागोपाठ आल्या आहेत. अशा मंगलप्रसंगी उपस्थितीही टाळता येत नाही. त्यामुळे विविध भागात वऱ्हाडी मंडळींना गारठा सहन करीत प्रवास करावा लागत आहे.