शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, समाजमंदिरांच्या कामांवर सर्वाधिक खर्च

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत निधीती त्यासाठी केला आहे.

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत आपल्या निधीतील आतापर्यंत खर्चित केलेल्या रक्कमेचा वापर प्रामुख्याने त्यासाठी केला आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याने दुष्काळाची भयावह परिस्थिती अनुभवली. जालना शहरात अनेक भागांमध्ये जलवाहिनी अंथरलेली नसल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या आमदार निधीतून प्रामुख्याने जलवाहिनी अंथरणे, अंतर्गत जलवाहिनी टाकणे त्याचबरोबर रस्त्यांच्या कामांवरही भर दिला. ७३ लाख ७० हजारांच्या खर्चातील जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदनचे आ. चंद्रकांत दानवे यांनी ४५.९२ लाखांच्या खर्चात सामाजिक सभागृहे आणि रस्त्यांच्या कामांवर भर दिला आहे. त्याचबरोबर नवीन पथदिवे, विविध समाजातील स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीची कामे यासाठी निधी दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी सामाजिक सभागृहे, स्मशानभुमी शेड, गावअंतर्गत सिमेंट रस्ते या कामांवर भर दिला. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांसाठीही त्यांनी निधी दिला. परतूरचे आ. सुरेश जेथलिया यांनी ६ लाख ७६ हजारांच्या खर्चामध्ये सांस्कृतिक सभागृह, आणि गावअंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्रामुख्याने निधी दिला. बदनापूरचे आ. संतोष सांबरे यांनी ४७ लाखांच्या खर्चामध्ये सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह या कामांसाठी निधी दिला आहे. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातील हे शेवटचे वर्ष असल्याने विविध अपूर्ण राहिलेल्या कामांवरही भर देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आमदार निधीच्या खर्चातून आवश्यक कामांची निवड करण्यातही काही आमदारांचा वेळ जात आहे. मात्र १५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागणार असल्याने प्रमुख कामांचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन व विकास कार्यालयाकडे पाठविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे. मतदारसंघात यापूर्वी काही कामांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसते. अशा कामांनाही निधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांमार्फत कामांची यादी करून त्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधितांमार्फत तातडीने देण्याकडे आमदारांचा कल आहे. (प्रतिनिधी)अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचाही प्रयत्ननिवडणूका जवळ आल्याने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नही आमदारांकडून होत आहे. त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे ज्या कामांसाठी आश्वासने दिली होती, ती कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात आहे.आचारसंहिता १५ आॅगस्टनंतर केव्हाही लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आमदार निधीअंतर्गत आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे झटपट करण्याच्या प्रयत्नात काहीजण आहेत. त्यासाठी काही कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.