शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

औरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 2:00 PM

औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

औरंगाबाद -  औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

11 मे व 12 मे रोजी औरंगाबादेत दोन गटांत हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला होता.  पोलिसांनी केलेला गोळीबार आणि दगडफेकीत 200 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

65 जणांविरोधात अटकेची कारवाईया प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, कार्यकर्ता लच्छू पहिलवान उर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया, एमआयएमचा नगरसेवक फेरोज खान यांच्यासह आतापर्यंत 65 जणांना पोलिसांनी अटक केली आहेत. हिंसाचार घडवून आणणऱ्या अन्य लोकांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. दरम्यान सर्वपक्षीय मुस्लीम आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी रात्री भेटले. या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)बीपीन बिहारी हे करणार आहेत. दंगलीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. पोलीस दंगलीत पक्षपातीपणे वागल्याचा आरोप होत आहे. दंगलीत दोषी आढळलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस