शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अहो आश्चर्यम्, म्हणे शहर स्मार्ट झाले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 19:19 IST

सत्ताधारी कोणत्याही आयुक्ताला कामच करू देत नाहीत.

ठळक मुद्दे मनपाचा दररोजचा खर्च ४५ लाख अन् उत्पन्न १० लाख, अशी दयनीय अवस्थासर्वसामान्यांच्या तक्रार अर्जाला विभागप्रमुख केराची टोपली दाखवतातमागील दोन वर्षांमध्ये ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प आहे.

ड्रेनेज चोकअप झाल्यावर दुरुस्तीसाठी मनपा कर्मचारी, कंत्राटदार आठ-आठ दिवस तिकडे फिरकत नाहीत. नळाला दूषित पाणी आल्याची तक्रार केल्यानंतरही सहा-सहा महिने मनपा कर्मचारी येत नाहीत. पथदिवे बंद असल्याचे सांगितल्यावर उलट नागरिकांनाच विचारणा होते, दिव्यांचा रंग कोणता? बांधकाम परवानगीसाठी सामान्य नागरिकाने संचिका दाखल केली, तर त्याचे केस पांढरे होईपर्यंत तरी परवानगी मिळत नाही...अतिक्रमण हटाव विभागात तक्रार केल्यावर तक्रारदारालाच नंतर दमदाटी करण्यात येते. नगरसेवकांच्या शब्दाला तर महापालिकेत कुठेच कवडीची किंमत राहिली नाही. कशासाठी निवडून आलो, असा पश्चात्ताप करण्याची वेळ अनेक नगरसेवकांवर आली आहे. तिजोरीत प्रचंड खडखडाट असल्याने महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे. असे असतानाही शहराचे प्रथम नागरिक महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी शहरात दोन वर्षांमध्ये विकासकामांचा प्रचंड पाऊस झाल्याचा खळबळजनक दावा बुधवारी केला.

निमित्त होते महापौर, उपमहापौर यांच्या कार्यकाळास २९ आॅक्टोबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्याचे. दिवाळीनिमित्त मंगळवारी वर्तमानपत्रांच्या कार्यालयांना सुटी असल्याने बुधवारी सेना-भाजप, एमआयएम, अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत महापौर घोडेले एकटेच तब्बल ५० मिनिटे नॉनस्टॉप शहरविकासावर बोलत होते. त्यांचे ५० मिनिटांचे भाषण ऐकल्यावर खरोखरच शहर स्मार्ट झाल्याचा फिल येतो... इच्छा नसतानाही मित्रपक्ष भाजप, एमआयएमला महापौरांच्या ‘हो’ला ‘हो’ करावे लागत होते.

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. युतीने मागील दोन वर्षांमध्ये खरोखरच विकासकामांचा अक्षरश: पाऊस पाडला असेल, तर लोकसभा निवडणुकीत सेनेला पराभव का पचवावा लागला? विधानसभा निवडणुकीत भाजपला औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात विजयासाठी मत विभाजनाचा प्रयोग करावा लागला. आगामी मनपा निवडणुकीत मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जाणार, असा प्रश्न युतीचे नगरसेवक उपस्थित करीत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प आहे. ड्रेनेज दुरुस्त करण्यासाठी कोणी फिरकायलाही तयार नाही. नगरसेवकच सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेटिंग मशीनच्या मागे फिरतात.

डेंग्यूने शहरात तब्बल ७ निष्पाप नागरिकांचा जीव घेतला. त्यानंतर युतीचे पदाधिकारी म्हणतात डेंग्यू नियंत्रणात आहे. शहरातील अनेक वसाहतींना आजही आठव्या आणि नवव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानंतरही सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविण्यात येते. मोकाट कुत्र्यांनी दोन वर्षांमध्ये किती जणांचे लचके तोडले. त्यात किती निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागला, याची किंचितही जाणीव सत्ताधाऱ्यांना राहिली नाही. महापालिकेच्या आवक विभागात दरवर्षी ८ हजार तक्रारी येतात. यातील १ टक्काही तक्रारींचे निरसन होत नाही. 

सर्वसामान्यांच्या तक्रार अर्जाला विभागप्रमुख केराची टोपली दाखवतात, महापालिकेचा कारभार असा दळभद्री आहे. महापौरांनी सकाळी सांगितलेले काम संध्याकाळी तर सोडा, दोन वर्षांपर्यंतही होतनाही. नियमात न बसणारे काम करून द्या, असा आग्रह अलीकडे सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसणे पसंत करीत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांचे प्रमाण का वाढले, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही.

अधिकाऱ्यांना निर्णयच घेऊ दिला जात नाहीमहापौरांना पत्रकार परिषदेत तुमच्या कार्यकाळातील मोजून १० कामे सांगा म्हटल्यावर त्यांना दम लागत होता. सत्ताधारी कोणत्याही आयुक्ताला कामच करू देत नाहीत. प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणून हाकलून लावले. ओम प्रकाश बकोरिया यांची बदली शासनाकडून केली. डॉ. निपुण विनायक यांना निर्णयच घेऊ देत नाहीत. चिकलठाण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्प, शहर बस, रोझ गार्डन, एलईडी दिवे, ही दोन-चार कामे सोडली, तर शहर विकासाची कामे ठप्प पडली आहेत.२५० कोटींची कंत्राटदारांची बिले दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. एक महिन्यापासून कंत्राटदार मनपासमोर उपोषणाला बसले आहेत. पैसे कधी मिळतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. मनपाचा दररोजचा खर्च ४५ लाख अन् उत्पन्न १० लाख, अशी दयनीय अवस्था झाली आहे. यानंतरही सत्ताधारी शहर स्मार्ट झाल्याचा अजब दावा करीत आहेत. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद