शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रडगाणे गाण्याऐवजी धाडसाने मदत करा

By admin | Updated: December 5, 2014 00:59 IST

जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी,

जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.जिल्ह्यातील डांबरी, शेवगा, रुई-भायडी या दुष्काळग्रस्त गावांना पवार यांनी गुरुवारी सकाळी भेटी दिल्या. ग्रामस्थांशी संवाद करीत पीक परिस्थतीची पाहणी केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी खा. अंकुशराव टोपे, आ. धनंजय मुंडे, आ. सतिष चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.मराठवाडा, विदर्भातील अभुतपूर्व दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. याआपत्तीत शेतकऱ्यांना आता भक्कम मदतीचीच नितांंत गरज आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भयावह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा हात दिला. त्याचप्रमाणे आता या शेतकऱ्यांना सर्वार्थाने पाठबळाची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून त्यातून पुढे आलेली वस्तुनिष्ठ परिस्थिती अधिवेशनातून सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे ते म्हणाले. सरकारी पातळीवरुन मदतीसंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. परंतु यासंदर्भात तात्काळ ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहेत, असेही ते म्हणाले. मराठवाड्यात आजही आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना बॅँकाद्वारे नोटिसा बजावल्या जात आहेत. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत होत असून डीपीसाठी पैश्यांची मागणी होत असल्याबद्दल पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली. दरम्यान या दौऱ्या प्रसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवार यांच्यासमोर मांडल्या, मदती द्यावी, अशी विनंती केली. (प्रतिनिधी)जायकवाडीतील जलसाठ्यातून औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचे तात्काळ आरक्षण करावे व उर्वरित पाण्याचेही नियोजन करावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.४सर्वसामान्य शेतकऱ्यांतून संपूर्ण पीक कर्जाची माफी, वीज बिलांची माफी, पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, शेतसारा माफ व्हावा. शैक्षणिक शुल्क पूर्णत: माफ करावे, अशी अपेक्षा होत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. कापूस उत्पादकांना बोनस ऐवजी एकरी सहाय्य अनुदानाची अपेक्षा आहे. सोयाबीन उत्पादकांचाही तोच सूर आहे, असेही ते म्हणाले. ४दुष्काळी स्थितीत शेततळ्यांची कामे करावीत. प्रकल्पातील गाळ काढणी करावी, छोट्या-मोठ्या नद्यांवर सिमेंट, शिरपूर, भूमिगत किंवा कोल्हापुरी बंधारे उभारावेत. दुष्काळी भागात चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले.४शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. उस्मानाबादेत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या स्थितीत सरकारने आम्ही बरोबर आहोत. अडचणीत साथ देवू, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत, खरीप व रबी हंगामातील पिकांची स्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईची समस्या ऐकली.