छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील १७महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.
मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला.
मे महिन्याने मोडला विक्रममेमधील २८ पैकी १६ दिवस पावसाची नोंद झाली. २५ वर्षात मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस बरसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी १७७मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण गतवर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसाच्या तुलनेत १३८९ टक्के इतके जास्त असून हा विक्रम आहे.
या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी जालना: जालना शहर (६६ मिमी), जालना ग्रामीण (६६ मिमी), परतूर (१०२ मिमी), वाटूर (६५ मिमी), आष्टी (६६ मिमी), श्रीष्टी (१०२ मिमी), बदनापूर (६५ मिमी), शेलगाव (६९ मिमी), बावणे (६८ मिमी), रोशनगाव (६५ मिमी), तीर्थपुरी (६९ मिमी), कुंभारी पिंपळगाव (६९ मिमी), अंतरवाली (६२ मिमी), रांजणी (७९ मिमी), जांब समर्थ (६६ मिमी), मंठा (७३ मिमी).
छत्रपती संभाजीनगर :चित्ते पिंपळगाव ७४, करमाड ६६, कचनेर ६६ , आडूळ ८०
लातूर :लातूर ६८, हरंगुळ ६८, कासारखेडा ६६, वडवळ ७०, अष्टा ९३
नांदेड:येवती ६५, जहूर ७५, गोळेगाव ६६
हिंगोली :कळमनुरी ६६, वाकोडी ८९, नांदापूर वारंगा ६५, वारंगा ६६(पाऊस मिमीमध्ये)