शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांसह पायभूत सुविधांना फटका, मराठवाड्याला भरपाईसाठी ७५० कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:52 IST

जुलै महिन्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधा कोलमडल्या 

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ४ लाख ४३ हजार ७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान आजवर झाले आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दुप्पट नुकसानभरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी जाहीर केले. त्यांच्या घोषणेनुसार मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागतील. विभागीय प्रशासनाने ३१० कोटींच्या नुकसानीचा अहवाल ३१ जुलै रोजी शिंदे यांना सादर केला होता.

गेल्या महिन्यात विभागीय आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील खरीप पीक नुकसानासह बाधित झालेल्या पायाभूत सुविधांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. शेती नुकसानभरपाईसाठी ३०८.८ कोटी, बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी अशा ७४२.४४ कोटींची मागणी प्रशासनाने केली आहे. ही मदत कमी असून मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव मदतीचा विचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी घोषणा केली.

अतिवृष्टी व पुरामुळे ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांचे ४ लाख ४३ हजार हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे, तर दीड हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून, मोबदल्यासाठी ३०८.८ कोटींचा निधी लागणार आहे, तर नांदेडमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी लागेल, असा प्राथमिक अहवाल आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिरायतीसाठी सहा हजार ८०० रुपये हेक्टरी मदत मिळते. बागायतीसाठी १३ हजार ५०० प्रति हेक्टर तर फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची तरतूद आहे. यात किती वाढ होते, त्याकडे लक्ष आहे.

मागील वर्षी दिली होती ३५८५ कोटींची मदतमराठवाड्यात मागील चार वर्षांपासून जास्तीच्या पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे वारंवार अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला फटका बसत आहे. यंदा जुलैमध्येच विभागातील एकूण १३ टक्के कृषी क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर या सहा जिल्ह्यांत खरीप पिकाला फटका बसला. मागील वर्षी पूर्ण पावसाळ्यात ३६ लाख ५२ हजार ८७२.९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. ४४ लाख ४७ हजार १६१ शेतकऱ्यांना ३ हजार ५८५.४२ कोटींची मदत शासनाने दिली होती.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा