शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

मुसळधार पावसाचे मराठवाड्यात ६ बळी; ५७ महसुली मंडळांत अतिवृष्टीने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:53 IST

मुखेड, उदगीर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; मुखेडमध्ये सैन्यदल पाचारण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मुसळधार आणि काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडविली असून, पावसाने ६ नागरिकांचे बळी घेतले आहेत. नांदेड जिल्ह्यात ३, बीडमध्ये १ आणि हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोनशेपेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून, हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.

मागील २४ तासांत मराठवाड्यातील ५७ मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून पाऊस मराठवाड्याला झोडपत असून, अनेक धरणे शंभर टक्के भरली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाचे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात हाहाकार उडाला असून, पाण्यात वाहून गेल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणचे पूल वाहून गेल्याने व अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, मुखेड तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’सह छत्रपती संभाजीनगरहून सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत रविवारी रात्री जोरदार पाऊस बरसला.

१५ आणि १६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. ढगफुटीसदृश पावसाने लेंडी नदीची पाणीपातळी १८ फुटांनी वाढल्याने नदीशेजारील गावे पाण्यात गेली. नागरिकांना छातीएवढ्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागले. पुरामुळे १० ते १२ व्यक्ती वाहून गेले. यापैकी तीन महिलांचे मृतदेह मिळाले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळला. दुसऱ्या एका घटनेत धबधब्यावर पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात १७ ऑगस्ट रोजी रात्री मुसळधार पावसामुळे लिंगी नदीला आलेल्या पुरात एक थरारक घटना घडली. लग्नावरून परतणाऱ्या चार मित्रांची कार कौडगाव हुडा शिवारात पुलावरून वाहून गेली. या घटनेत एका मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी वाचविले.

लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोपडल्याने उदगीर तालुक्यातील बोरगाव, धडकनाळ गावांस पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे या गावांतील ३३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या आपत्तीत ७० शेळ्या आणि १० मोठी जनावरे दगावली असून, शेकडो एकरवरील पिके पाण्यात आहेत. तसेच दोन ट्रॅक्टर, एक पिकअप वाहन वाहून गेले. सहा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे.

 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी